[ad_1]
औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. शनिवारी (ता. १९) दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान त्याच्या उघडलेल्या दरवाजांची उंची कमी करून विसर्ग घटविण्यात आला. धरणाच्या विविध दरवाजांमधून ४७ हजार १६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू होता.
सातत्याने सुरू असलेल्या आवकेमुळे शुक्रवारी(ता.१८) सकाळी सहा वाजता जायकवाडी प्रकल्पातून ९४ हजार ३२० क्युसेकने गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू होता. त्यावेळी जायकवाडी प्रकल्पात ३७ हजार ६६२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
शुक्रवारी सायंकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे चार फूट उंचीने उघडण्यात आलेले १८ दरवाजे साडेतीन फूट केले गेले. नऊ हजार ४३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे त्यावेळी ६६ हजार चोवीस क्युसेकने विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू होता.
शनिवारी सकाळी सहा वाजता जायकवाडीत ५७ हजार २१४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यावेळी जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २८६०.००८६ दलघमी, तर उपयुक्त पाणीसाठा २१२१.९०२ दलघमी इतका होता.
उपयुक्त पाणीसाठा ९७.७४ टक्के असलेल्या जायकवाडी प्रकल्पातून उजव्या कालव्याद्वारे १०० क्युसेकने, तर दरवाजांमधून ५६ हजार ५९२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, अशी माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. शनिवारी (ता. १९) दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान त्याच्या उघडलेल्या दरवाजांची उंची कमी करून विसर्ग घटविण्यात आला. धरणाच्या विविध दरवाजांमधून ४७ हजार १६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू होता.
सातत्याने सुरू असलेल्या आवकेमुळे शुक्रवारी(ता.१८) सकाळी सहा वाजता जायकवाडी प्रकल्पातून ९४ हजार ३२० क्युसेकने गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू होता. त्यावेळी जायकवाडी प्रकल्पात ३७ हजार ६६२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
शुक्रवारी सायंकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे चार फूट उंचीने उघडण्यात आलेले १८ दरवाजे साडेतीन फूट केले गेले. नऊ हजार ४३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे त्यावेळी ६६ हजार चोवीस क्युसेकने विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू होता.
शनिवारी सकाळी सहा वाजता जायकवाडीत ५७ हजार २१४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यावेळी जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २८६०.००८६ दलघमी, तर उपयुक्त पाणीसाठा २१२१.९०२ दलघमी इतका होता.
उपयुक्त पाणीसाठा ९७.७४ टक्के असलेल्या जायकवाडी प्रकल्पातून उजव्या कालव्याद्वारे १०० क्युसेकने, तर दरवाजांमधून ५६ हजार ५९२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, अशी माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
[ad_2]
Source link