[ad_1]
नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता हुरड्यात आली आहे. या पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी शेतकऱ्यांकडून ज्वारीच्या कणसांना प्लॅस्टिक पिशव्यांचे आवरण घातले जात आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी हा नवा जुगाड शोधून काढला आहे.
तालुक्यात ज्वारीचे पीक ठरावीक भागात व कमी प्रमाणात घेतले जात असल्याने, पक्ष्यांचे थवेच्या थवे त्यावर तुटून पडतात. प्लास्टिक पिशव्यांद्वारे पिकाचा बचाव केला जात आहे. पूर्वी गोफण फिरवून पक्ष्यांना पिटाळून लावले जायचे. काही जण बुजगावणी उभी करून पक्ष्यांना घाबरवत. काही जण फटाके वाजवीत. हल्लीच्या डिजिटल युगात गावोगावचे शेतकरी स्मार्ट जुगाड शोधत आहेत. कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांकडून ज्वारीचे पीक घेतले जाते.
फेब्रुवारी-मार्चमध्ये ते काढणीला येते. या सुगीच्या हंगामात धान्य खाण्यासाठी सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे थवे पिकांवर बसतात. त्यामुळे पक्ष्यांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळे फंडे वापरले जातात. पक्ष्यांना ज्वारीचे दाणे दिसत असले, तरी प्रत्यक्षात खाता येत नसल्याने तसेच प्लास्टिक उन्हामुळे चमकत असल्यामुळे कोणीतरी असल्याचा भास पक्ष्यांना होत असून नुकसान टळत आहे.
पक्ष्यांकडून धान्य फस्त…
नेवासे बुद्रुक, भालगाव, घोडेगावसह नारायणवाडी, तामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. नेवासे तालुक्यात यंदा ज्वारी केवळ १ हजार २०० हेक्टरवर पेरणी गेली आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथे पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात येऊन धान्य फस्त करतात.
पूर्वी सुगीच्या काळामध्ये काढणीयोग्य ज्वारीचे पक्ष्यांपासून रक्षण गोफण-धोंडा पद्धतीने करण्यात येत होते. तसेच, विचित्र आवाज काढले जात. आता शेतामध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने असे प्रयोग केले जातात.
– संजय काकडे,
प्रगतिशील शेतकरी, नारायणवाडी
नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता हुरड्यात आली आहे. या पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी शेतकऱ्यांकडून ज्वारीच्या कणसांना प्लॅस्टिक पिशव्यांचे आवरण घातले जात आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी हा नवा जुगाड शोधून काढला आहे.
तालुक्यात ज्वारीचे पीक ठरावीक भागात व कमी प्रमाणात घेतले जात असल्याने, पक्ष्यांचे थवेच्या थवे त्यावर तुटून पडतात. प्लास्टिक पिशव्यांद्वारे पिकाचा बचाव केला जात आहे. पूर्वी गोफण फिरवून पक्ष्यांना पिटाळून लावले जायचे. काही जण बुजगावणी उभी करून पक्ष्यांना घाबरवत. काही जण फटाके वाजवीत. हल्लीच्या डिजिटल युगात गावोगावचे शेतकरी स्मार्ट जुगाड शोधत आहेत. कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून शेतकऱ्यांकडून ज्वारीचे पीक घेतले जाते.
फेब्रुवारी-मार्चमध्ये ते काढणीला येते. या सुगीच्या हंगामात धान्य खाण्यासाठी सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे थवे पिकांवर बसतात. त्यामुळे पक्ष्यांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळे फंडे वापरले जातात. पक्ष्यांना ज्वारीचे दाणे दिसत असले, तरी प्रत्यक्षात खाता येत नसल्याने तसेच प्लास्टिक उन्हामुळे चमकत असल्यामुळे कोणीतरी असल्याचा भास पक्ष्यांना होत असून नुकसान टळत आहे.
पक्ष्यांकडून धान्य फस्त…
नेवासे बुद्रुक, भालगाव, घोडेगावसह नारायणवाडी, तामसवाडी शिवारात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते. नेवासे तालुक्यात यंदा ज्वारी केवळ १ हजार २०० हेक्टरवर पेरणी गेली आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथे पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात येऊन धान्य फस्त करतात.
पूर्वी सुगीच्या काळामध्ये काढणीयोग्य ज्वारीचे पक्ष्यांपासून रक्षण गोफण-धोंडा पद्धतीने करण्यात येत होते. तसेच, विचित्र आवाज काढले जात. आता शेतामध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी असल्याने असे प्रयोग केले जातात.
– संजय काकडे,
प्रगतिशील शेतकरी, नारायणवाडी
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.