[ad_1]
आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी सुरू झाले. खरसुंडी ते हिवतड कालव्यातून हिवतड येथून तीन ठिकाणी आणि डाव्या कालव्यातून पारेकरवाडी तलावात पाणी सोडले, तर बंद पाइपलाइनची जागोजागी चाचणीही सुरू केली आहे.
टेंभू योजनेचे पंप गेल्या आठवड्यात सुरू होते. आठ दिवसांपूर्वी घाणंद तलावात पाणी पोहोचले होते. तलाव भरल्यानंतर मागणी असलेल्या भागासाठी कालवा आणि ओढ्याने पाणी सुरू केले आहे. खरसुंडी-हिवतड मुख्य कालव्यावर हिवतड येथून तीन ठिकाणी पाणी सोडले असून, मागणी असलेले चार बंधारे भरून पाणी बंद केली जाणार आहे. डाव्या कालव्यावरील पारेकरवाडी तलावात पाणी चालू केले आहे. पाण्याची मागणी केलेल्या भागाला पाणी सोडण्याचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे.
बंद पाइपलाइनची चार दिवसांपासून संबंधित कंपनीने तपासणी करून पाणी सोडण्याची चाचणी सुरू केली आहे. घाणंद वितेरिकावरील मुढेवाडी, कामत या ठिकाणी चाचणी केली. तसेच खरसुंडी वितरिकेवरील बनपुरी, तडवळे, तळेवाडी येथेही चाचणी केली आहे. काही ठिकाणी चाचणी यशस्वी झाली आहे, तर अनेक ठिकाणी पाइपलाइनला गळती लागली आहे. गळती काढून चार दिवसांनंतर दुसरी चाचणी सुरू केली जाणार आहे. त्यानंतर पाइपलाइनची अधिकृतरीत्या चाचणी करून मागणी असलेल्या भागाला पाणी सोडले जाणार आहे.
मागणी विना नियोजनात अडचणी
या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच बहुतांश तलावात मोठा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत नसल्यामुळे अद्याप मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे आलेली नाही. मागणी नसल्यामुळे पाटबंधारे विभागाला पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी निर्माण झाले आहेत.
आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी सुरू झाले. खरसुंडी ते हिवतड कालव्यातून हिवतड येथून तीन ठिकाणी आणि डाव्या कालव्यातून पारेकरवाडी तलावात पाणी सोडले, तर बंद पाइपलाइनची जागोजागी चाचणीही सुरू केली आहे.
टेंभू योजनेचे पंप गेल्या आठवड्यात सुरू होते. आठ दिवसांपूर्वी घाणंद तलावात पाणी पोहोचले होते. तलाव भरल्यानंतर मागणी असलेल्या भागासाठी कालवा आणि ओढ्याने पाणी सुरू केले आहे. खरसुंडी-हिवतड मुख्य कालव्यावर हिवतड येथून तीन ठिकाणी पाणी सोडले असून, मागणी असलेले चार बंधारे भरून पाणी बंद केली जाणार आहे. डाव्या कालव्यावरील पारेकरवाडी तलावात पाणी चालू केले आहे. पाण्याची मागणी केलेल्या भागाला पाणी सोडण्याचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे.
बंद पाइपलाइनची चार दिवसांपासून संबंधित कंपनीने तपासणी करून पाणी सोडण्याची चाचणी सुरू केली आहे. घाणंद वितेरिकावरील मुढेवाडी, कामत या ठिकाणी चाचणी केली. तसेच खरसुंडी वितरिकेवरील बनपुरी, तडवळे, तळेवाडी येथेही चाचणी केली आहे. काही ठिकाणी चाचणी यशस्वी झाली आहे, तर अनेक ठिकाणी पाइपलाइनला गळती लागली आहे. गळती काढून चार दिवसांनंतर दुसरी चाचणी सुरू केली जाणार आहे. त्यानंतर पाइपलाइनची अधिकृतरीत्या चाचणी करून मागणी असलेल्या भागाला पाणी सोडले जाणार आहे.
मागणी विना नियोजनात अडचणी
या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच बहुतांश तलावात मोठा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत नसल्यामुळे अद्याप मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे आलेली नाही. मागणी नसल्यामुळे पाटबंधारे विभागाला पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी निर्माण झाले आहेत.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.