[ad_1]
सांगली : राज्यातील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी व पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन योजना राबविणे ही काळाची गरज झाली आहे. ठिबक सिंचनाद्वारे राज्यातील जास्तीत जास्त कृषी क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ठिबक सिंचन योजनांचे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.
गोटखिंडी (ता. वाळवा) येथील श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची शुक्रवारी (ता. ९) पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा व आष्टा येथे कृषिरत्न पुरस्कारार्थी प्राप्त संजीव माने यांचा सत्कार समारंभ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, आनंदराव पवार, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, ‘‘राज्यामध्ये शेतीला काही ठिकाणी पाण्याचे दुर्भीक्ष आहे. पाण्याचा अति वापर होत असल्याने शेती नापीक होत चालली आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून भूमिगत ठिबक सिंचन योजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ठिबक सिंचनामुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच भरघोस उत्पन्नवाढीसाठीही उपयोग होतो. त्यामुळे शेतीची नापीकता होत नाही. ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्याला मजुराचा खर्च, खतांचा खर्च कमी होण्यास मदत होते. आंध्र प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यातही महाराष्ट्रात ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल.’’
श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेने राबविलेला ठिबक सिंचनाचा प्रकल्प हा राज्यासाठी दिशादर्शक असून, याची अंमलबजावणी इतर जिल्ह्यांतही करण्यावर भर देण्यात येईल. सध्या कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला असून अनेक ठिकाणी शासन, स्थानिक प्रशासन यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
सांगली : राज्यातील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी व पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन योजना राबविणे ही काळाची गरज झाली आहे. ठिबक सिंचनाद्वारे राज्यातील जास्तीत जास्त कृषी क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ठिबक सिंचन योजनांचे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.
गोटखिंडी (ता. वाळवा) येथील श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची शुक्रवारी (ता. ९) पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा व आष्टा येथे कृषिरत्न पुरस्कारार्थी प्राप्त संजीव माने यांचा सत्कार समारंभ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, आनंदराव पवार, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, ‘‘राज्यामध्ये शेतीला काही ठिकाणी पाण्याचे दुर्भीक्ष आहे. पाण्याचा अति वापर होत असल्याने शेती नापीक होत चालली आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून भूमिगत ठिबक सिंचन योजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. ठिबक सिंचनामुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच भरघोस उत्पन्नवाढीसाठीही उपयोग होतो. त्यामुळे शेतीची नापीकता होत नाही. ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्याला मजुराचा खर्च, खतांचा खर्च कमी होण्यास मदत होते. आंध्र प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्यातही महाराष्ट्रात ठिबक सिंचन योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल.’’
श्री महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेने राबविलेला ठिबक सिंचनाचा प्रकल्प हा राज्यासाठी दिशादर्शक असून, याची अंमलबजावणी इतर जिल्ह्यांतही करण्यावर भर देण्यात येईल. सध्या कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला असून अनेक ठिकाणी शासन, स्थानिक प्रशासन यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.