[ad_1]
डाळिंब पीकविम्यासाठी अधिसूचित औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी, अकोला आणि हिंगोली जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित मंडळांत लागू आहे.
आंबिया बहर २०२०-२१
ही योजना डाळिंब पीकविम्यासाठी अधिसूचित औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी, अकोला आणि हिंगोली जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित मंडळांत लागू आहे. या जिल्ह्यांत शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसानभरपाई अंतिम केली जाते.
या योजनेअंतर्गत डाळिंब पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीकनुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग
- या योजनेत अधिसूचित क्षेत्रांत, अधिसूचित फळपिकांसाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
- पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुक वरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
- एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)
- एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत राहणार आहे. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात
- येतो.
- या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून अदा केली जाते.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि प्रमाणके (ट्रिगर) | नुकसानभरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर) |
जादा तापमान (दि. १ जानेवारी २०२१ ते १५ मार्च २०२१) | |
सलग २ दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास | रुपये १९५०० |
सलग ३ दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास | रुपये ३२५०० |
सलग ४ दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास | रुपये ६५००० |
जास्त पाऊस व आर्द्रता (दि. १ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१) | |
सलग ५ ते ६ दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास | रुपये १९५०० |
सलग ७ ते ८ दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास | रुपये ३२५०० |
सलग ९ व त्यापेक्षा जास्त दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास | रुपये ६५००० |
गारपिटीपासून संरक्षण कालावधी (दि. १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१) | |
गारपीट झाल्यास रक्कम रुपये ४३३३३ च्या मर्यादेत वैयक्तिक पंचनामा करून नुकसानभरपाई देय राहील. |
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
कंपनीचे नाव | समाविष्ट जिल्हे |
बजाज अलायंज जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे | बुलडाणा, जळगाव, पुणे, उस्मानाबाद. |
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई | धुळे, सोलापूर, बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, हिंगोली. |
एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई | नगर, नाशिक, वाशीम, सातारा, परभणी, जालना, लातूर |
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके | विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रति हेक्टर) | शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (रुपये प्रति हेक्टर) |
जास्त तापमान, जास्त पाऊस | १३०००० | ६५०० |
गारपीट | ४३३३३ | २१६७ |
योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक – ३१ डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग संकेत स्थळ www.krishi.maharashtra.gov.in वर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
(लेखक कृषी विभागात उपायुक्त (कृषी गणना) आहेत)
डाळिंब पीकविम्यासाठी अधिसूचित औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी, अकोला आणि हिंगोली जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित मंडळांत लागू आहे.
आंबिया बहर २०२०-२१
ही योजना डाळिंब पीकविम्यासाठी अधिसूचित औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी, अकोला आणि हिंगोली जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित मंडळांत लागू आहे. या जिल्ह्यांत शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसानभरपाई अंतिम केली जाते.
या योजनेअंतर्गत डाळिंब पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीकनुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग
- या योजनेत अधिसूचित क्षेत्रांत, अधिसूचित फळपिकांसाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
- पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुक वरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
- एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)
- एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत राहणार आहे. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात
- येतो.
- या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून अदा केली जाते.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि प्रमाणके (ट्रिगर) | नुकसानभरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर) |
जादा तापमान (दि. १ जानेवारी २०२१ ते १५ मार्च २०२१) | |
सलग २ दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास | रुपये १९५०० |
सलग ३ दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास | रुपये ३२५०० |
सलग ४ दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास | रुपये ६५००० |
जास्त पाऊस व आर्द्रता (दि. १ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१) | |
सलग ५ ते ६ दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास | रुपये १९५०० |
सलग ७ ते ८ दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास | रुपये ३२५०० |
सलग ९ व त्यापेक्षा जास्त दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास | रुपये ६५००० |
गारपिटीपासून संरक्षण कालावधी (दि. १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१) | |
गारपीट झाल्यास रक्कम रुपये ४३३३३ च्या मर्यादेत वैयक्तिक पंचनामा करून नुकसानभरपाई देय राहील. |
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
कंपनीचे नाव | समाविष्ट जिल्हे |
बजाज अलायंज जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे | बुलडाणा, जळगाव, पुणे, उस्मानाबाद. |
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई | धुळे, सोलापूर, बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, हिंगोली. |
एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई | नगर, नाशिक, वाशीम, सातारा, परभणी, जालना, लातूर |
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता
हवामान धोके | विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रति हेक्टर) | शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (रुपये प्रति हेक्टर) |
जास्त तापमान, जास्त पाऊस | १३०००० | ६५०० |
गारपीट | ४३३३३ | २१६७ |
योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक – ३१ डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग संकेत स्थळ www.krishi.maharashtra.gov.in वर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
(लेखक कृषी विभागात उपायुक्त (कृषी गणना) आहेत)
[ad_2]
Source link