[ad_1]
पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळपासून मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले होते. कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत असून पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे.
राज्यात तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढला होता. तरीही दुपारनंतर अचानक ढगांची दाटी होऊन पाऊस पडत होता. सुरूच आहे. मराठवाडा, खानदेश आणि तळकोकण भागात कमीअधिक स्वरूपात वादळ, वारे, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. काही ठिकाणी वित्तहानी व जीवितहानी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र कालपासून मध्य महाराष्ट्र व परिसरातील अनेक भागांत पावसासाठी ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाल्याने कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे.
साताऱ्यातही म्हसवड परिसरात पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. यामुळे द्राक्षे उत्पादकांसमोर आव्हान उभे राहिले आहे. नगर जिल्ह्यातही नेवासा, श्रीरामपूर परिसरात पावसाचे तुटक तुटक थेंब पडले असून कर्जत जामखेड तालुक्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे चिंतेचे ढग जमा झाले होते.
आंबा पिकाला फटका
सध्या अनेक ठिकाणी आंबा काढणी सुरू आहे. मात्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने आंब्याचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच इतर पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. रत्नागिरीमधील खेड, संगमेश्वर परिसरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळपासून मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले होते. कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत असून पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे.
राज्यात तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढला होता. तरीही दुपारनंतर अचानक ढगांची दाटी होऊन पाऊस पडत होता. सुरूच आहे. मराठवाडा, खानदेश आणि तळकोकण भागात कमीअधिक स्वरूपात वादळ, वारे, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. काही ठिकाणी वित्तहानी व जीवितहानी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र कालपासून मध्य महाराष्ट्र व परिसरातील अनेक भागांत पावसासाठी ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाल्याने कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे.
साताऱ्यातही म्हसवड परिसरात पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. यामुळे द्राक्षे उत्पादकांसमोर आव्हान उभे राहिले आहे. नगर जिल्ह्यातही नेवासा, श्रीरामपूर परिसरात पावसाचे तुटक तुटक थेंब पडले असून कर्जत जामखेड तालुक्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे चिंतेचे ढग जमा झाले होते.
आंबा पिकाला फटका
सध्या अनेक ठिकाणी आंबा काढणी सुरू आहे. मात्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने आंब्याचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच इतर पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. रत्नागिरीमधील खेड, संगमेश्वर परिसरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.