[ad_1]
सांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी द्यावे, यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येत आहेत. या लाभ क्षेत्रात ७२ पाणी वापर संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. सध्या २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून उर्वरित पाणी वापर संस्था होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.
जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी देण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने नियोजन केले. ताकारी योजनेत सुमारे २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र असून वाळवा, पलूस, कडेगाव, तासगाव आणि मिरज या तालुक्यांचा समाविष्ट आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, पाणी पट्टी वसूल आणि पाण्याची बचत यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यानुसार ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पुढे आले. या योजनेच्या लाभ क्षेत्रात सुमारे ७२ पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. ७२ संस्थांसाठी अधिसूचना १ व २ मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी अधिसूचना ३ असलेल्या पाणी वापर संस्थांची संख्या ५८ इतकी आहे.
सध्या २८ पाणी वापर संस्थांसाठी निवडणूक झाली असून त्यांचे संचालक मंडळही स्थापन झाले आहे. मात्र, उर्वरित पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रात २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहे. परंतु या संस्थांकडे क्षेत्र हस्तांतरित केलेले नाही.
पाणी वापर संस्थेचे कामकाज
पाणी वापर संस्थेमध्ये किती क्षेत्र आहे. त्याची माहिती पाटबंधारे विभागाला कळवावी लागणार आहे. त्यानंतर पाणी वापर संस्थेने योजनेकडे पाण्याची मागणी केल्यानंतर आवर्तन सुरू केले जाणार आहे. त्यानुसार पाणीवाटप संस्थांकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाईल.
ताकारी उपसा सिंचन योजनेवरील ७२ पाणी वापर संस्था असून त्यापैकी २८ संस्थांच्या निवडणुका घेऊन संचालक मंडळ स्थापन केल्या आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याबाबत शेतकऱ्यांबाबत बैठक घेतली नाही. त्यामुळे उर्वरित पाणी वापर संस्थांची स्थापना राहिली आहे. लवकर पाणी वापर संस्था स्थापन केल्या जातील.
– प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी उपसा सिंचन योजना
सांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी द्यावे, यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येत आहेत. या लाभ क्षेत्रात ७२ पाणी वापर संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. सध्या २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असून उर्वरित पाणी वापर संस्था होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.
जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे पाणी देण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने नियोजन केले. ताकारी योजनेत सुमारे २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र असून वाळवा, पलूस, कडेगाव, तासगाव आणि मिरज या तालुक्यांचा समाविष्ट आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, पाणी पट्टी वसूल आणि पाण्याची बचत यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यानुसार ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी पुढे आले. या योजनेच्या लाभ क्षेत्रात सुमारे ७२ पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. ७२ संस्थांसाठी अधिसूचना १ व २ मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी अधिसूचना ३ असलेल्या पाणी वापर संस्थांची संख्या ५८ इतकी आहे.
सध्या २८ पाणी वापर संस्थांसाठी निवडणूक झाली असून त्यांचे संचालक मंडळही स्थापन झाले आहे. मात्र, उर्वरित पाणी वापर संस्था कधी स्थापन होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रात २८ पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहे. परंतु या संस्थांकडे क्षेत्र हस्तांतरित केलेले नाही.
पाणी वापर संस्थेचे कामकाज
पाणी वापर संस्थेमध्ये किती क्षेत्र आहे. त्याची माहिती पाटबंधारे विभागाला कळवावी लागणार आहे. त्यानंतर पाणी वापर संस्थेने योजनेकडे पाण्याची मागणी केल्यानंतर आवर्तन सुरू केले जाणार आहे. त्यानुसार पाणीवाटप संस्थांकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाईल.
ताकारी उपसा सिंचन योजनेवरील ७२ पाणी वापर संस्था असून त्यापैकी २८ संस्थांच्या निवडणुका घेऊन संचालक मंडळ स्थापन केल्या आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने याबाबत शेतकऱ्यांबाबत बैठक घेतली नाही. त्यामुळे उर्वरित पाणी वापर संस्थांची स्थापना राहिली आहे. लवकर पाणी वापर संस्था स्थापन केल्या जातील.
– प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी उपसा सिंचन योजना
[ad_2]
Source link