[ad_1]
नाशिक : सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथील कठगड शिवारात विजय शांताराम घांगुर्डे यांचा साधारण पाच एकर ऊस जळून खाक झाला. आग कशामुळे लागली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. घांगुर्डे यांसह शेजारच्या शेतकऱ्याचे मिळून ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
कठगड शिवारातील गट क्रमांक.२२५ मध्ये घांगुर्डे यांचा २६५ या जातीचा साधारण १२ महिन्यांचा ऊस होता. त्यांच्या शेजारी ऊसतोड सुरू होती. दुपारी २ वाजेदरम्यान आग लागली. त्यामुळे साधारण साडे तीन एकर ऊस जळून नुकसान झाले. आग पसरल्याने शेजारच्या शेतातील शशिकांत दत्तात्रेय पगारे यांचा २ एकर ऊस जळाला.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात पूर्ण यश आले नाही. याबाबत तलाठी आर. व्ही. खैरनार, कोतवाल ईश्वर खरे यांनी पंचनामा केला.
द्वारकाधीश साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी विजय पगार यांनीही पाहणी केली. याबाबत शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ऊस उत्पादक घांगुर्डे यांनी केली.
नाशिक : सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथील कठगड शिवारात विजय शांताराम घांगुर्डे यांचा साधारण पाच एकर ऊस जळून खाक झाला. आग कशामुळे लागली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. घांगुर्डे यांसह शेजारच्या शेतकऱ्याचे मिळून ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
कठगड शिवारातील गट क्रमांक.२२५ मध्ये घांगुर्डे यांचा २६५ या जातीचा साधारण १२ महिन्यांचा ऊस होता. त्यांच्या शेजारी ऊसतोड सुरू होती. दुपारी २ वाजेदरम्यान आग लागली. त्यामुळे साधारण साडे तीन एकर ऊस जळून नुकसान झाले. आग पसरल्याने शेजारच्या शेतातील शशिकांत दत्तात्रेय पगारे यांचा २ एकर ऊस जळाला.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात पूर्ण यश आले नाही. याबाबत तलाठी आर. व्ही. खैरनार, कोतवाल ईश्वर खरे यांनी पंचनामा केला.
द्वारकाधीश साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी विजय पगार यांनीही पाहणी केली. याबाबत शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ऊस उत्पादक घांगुर्डे यांनी केली.
[ad_2]
Source link