[ad_1]
नांदेड : माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे शुक्रवारी (ता.२०) केंद्र शासनाच्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूरच्या पथकाने वाई बाजार येथील बंडू गेडाम यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी पथककाडून कपाशीवर बोंडअळी नाही तर बोंडसड होऊन त्यावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी नागपूर कीटक व्यवस्थापन केंद्राच्या केंद्रीय पथकात वनस्पती पॅथॉलॉजीचे वनस्पती संरक्षण अधिकारी एस. महेश, तांत्रिक अधिकारी के. नीतीराज यांचा समावेश होता.
सोबतच जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, तालुका कृषी अधिकारी बी. बी. मुंडे, कृषी सहाय्यक विठ्ठल ईटकापल्ले, प्रगत शेतकरी संदीप पडलवार, डॉ. बाबा डाखोरे, कैलाश बेहेरे, मृणाल येवतकर, अमजद हैदर खान पठाण आदींची उपस्थिती होती.
अमृत देशमुख यांनी बोंडअळी संदर्भात पडताळणी पथकासमोर मुद्दे मांडले.
कापूस बियाणे घेताना घ्यावयाची दक्षता या संदर्भात केंद्रातील पथकांनी विश्लेषक विनिमय करून शेतकऱ्यांनी समूह शेतीचा पर्याय निवडल्यास कापसावर आलेल्या भयंकर रोगावर देखील नियंत्रण मिळवता येते. यासाठी येथील शेतकऱ्यांना केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूर येथे प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही पथकाने दिला. लवकरच माहूर तालुक्यातील वीस ते पंचवीस शेतकरी नागपूर येथे प्रशिक्षणासाठी आणणार असल्याची ग्वाही डॉ. डाखोरे व संदीप पडलवार यांनी दिली. बॅक्टेरियामुळे बोंडसड होऊन कालांतराने त्यात अळी निर्माण होऊन होणाऱ्या नुकसानीचे निराकरण करण्यासाठी पथकातील वनस्पती पॅथॉलॉजीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.
नांदेड : माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे शुक्रवारी (ता.२०) केंद्र शासनाच्या एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूरच्या पथकाने वाई बाजार येथील बंडू गेडाम यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी पथककाडून कपाशीवर बोंडअळी नाही तर बोंडसड होऊन त्यावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी नागपूर कीटक व्यवस्थापन केंद्राच्या केंद्रीय पथकात वनस्पती पॅथॉलॉजीचे वनस्पती संरक्षण अधिकारी एस. महेश, तांत्रिक अधिकारी के. नीतीराज यांचा समावेश होता.
सोबतच जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, तालुका कृषी अधिकारी बी. बी. मुंडे, कृषी सहाय्यक विठ्ठल ईटकापल्ले, प्रगत शेतकरी संदीप पडलवार, डॉ. बाबा डाखोरे, कैलाश बेहेरे, मृणाल येवतकर, अमजद हैदर खान पठाण आदींची उपस्थिती होती.
अमृत देशमुख यांनी बोंडअळी संदर्भात पडताळणी पथकासमोर मुद्दे मांडले.
कापूस बियाणे घेताना घ्यावयाची दक्षता या संदर्भात केंद्रातील पथकांनी विश्लेषक विनिमय करून शेतकऱ्यांनी समूह शेतीचा पर्याय निवडल्यास कापसावर आलेल्या भयंकर रोगावर देखील नियंत्रण मिळवता येते. यासाठी येथील शेतकऱ्यांना केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्र नागपूर येथे प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही पथकाने दिला. लवकरच माहूर तालुक्यातील वीस ते पंचवीस शेतकरी नागपूर येथे प्रशिक्षणासाठी आणणार असल्याची ग्वाही डॉ. डाखोरे व संदीप पडलवार यांनी दिली. बॅक्टेरियामुळे बोंडसड होऊन कालांतराने त्यात अळी निर्माण होऊन होणाऱ्या नुकसानीचे निराकरण करण्यासाठी पथकातील वनस्पती पॅथॉलॉजीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले.
[ad_2]
Source link