[ad_1]
दक्षिण ऑस्ट्रेलिया येथील अॅडलेड परिसरातील हरितगृहात टोमॅटो उत्पादनामध्ये तुटीच्या सिंचनासह पुनर्चक्रित सांडपाण्याचे सलग दोन वर्षे प्रयोग करण्यात आले. त्यातील किंचित तुटीच्या सिंचनामध्ये (८० टक्के ) उत्पादनावर फारसा परिणाम न होता उत्तम पाणी वापर कार्यक्षमता मिळत असल्याचे दिसून आले. हे निष्कर्ष ‘अॅग्रीकल्चर’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले.
जगातील सर्वात कोरड्या खंडातील सर्वात कोरड्या प्रदेशामध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. येथील शेतकऱ्यांना दुष्काळ आणि पाण्याच्या कमतरतेचा सामना सातत्याने करावा लागत असल्याने पाण्याविषयी प्रचंड जागरूकता आहे. पिकांच्या विकासासाठी सिंचनाच्या अत्यंत कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतींचा शोध येथे घेतला जात आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठामध्ये नुकताच पाण्याचा दर्जा आणि सिंचनाचे कमी प्रमाण यांचा पिकांच्या विकास, उत्पादन आणि पाण्याच्या एकूण उत्पादकतेवरील परिणामांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये पुनर्चक्रित सांडपाण्याचे निष्कर्ष सर्वात चांगले मिळाले आहेत. आपल्या पीएच. डी. साठी केलेल्या या अभ्यास व निष्कर्षाविषयी माहिती देताना जीत चांद यांनी सांगितले, की दुष्काळग्रस्त आणि कोरड्या भूभागासाठी पाणी ही अत्यंत मोलाची निविष्ठा ठरत आहे. सिंचनासाठी योग्य धोरण ठरवणे, पाण्याच्या नियमित स्रोतांना पर्याय स्रोत तयार करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यात तुटीच्या पाणी पुरवठ्याची संकल्पना शेतकऱ्यांकडून अनेक वेळा परिस्थितीनुरूप वापरली जाते. या संकल्पनेत पाण्याचे प्रमाण कमी ठेवण्यासोबतच पिकांच्या उत्पादकतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याकडे लक्ष दिले जाते. पिकांच्या नेमक्या संवेदनशील अवस्थांची ओळख पटवून, त्याचवेळी पाण्याचा वापर केला जातो. यातून पाणी वापराची कार्यक्षमता वाढवली जाते.
प्रयोग व निष्कर्ष ः
- उत्तर अॅडलेड पठारी प्रदेशामध्ये एकूण दक्षिण ऑस्ट्रेलियातील टोमॅटो उत्पादनाच्या ९० टक्के टोमॅटो उत्पादन होते. येथे बहुतांश शेती ही हरितगृहामध्ये केली जाते. संपूर्ण ऑस्ट्रेलिया देशातील हरितगृहाचे सर्वांत अधिक प्रमाण याच विभागात आहे. या विभागामध्ये गेल्या दोन वर्षापासून टोमॅटो पिकांतील सिंचनासाठी प्रयोग करण्यात आले. त्यात भूजल, पुनर्चक्रित सांडपाणी, ५० टक्के सांडपाण्याबरोबर मिश्रण यांचा वापर केला. तसेच मातीच्या ओलाव्याची पातळी ६०, ७०, ८० आणि १०० टक्के इतकी ठेवण्यात आली.
- ओलाव्याची पातळी १०० टक्के असताना पिकांची वाढीची पातळी सर्वाधिक होती. मात्र, किंचित ताणाच्या स्थितीमध्ये (८० टक्के) असताना उत्पादनामध्ये लक्षणीय घट न होता सिंचनाची कार्यक्षमता चांगली मिळाली.
- पुनर्चक्रित पाण्याची उपलब्धता चांगली असल्यास शेतीमध्ये त्यांचा वापर दुहेरी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, नेहमीचे सांडपाणी आणि पुनर्चक्रित पाणी यात लक्षणीय फरक आहे, ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
जलस्रोतामध्ये भूजल हे येथील महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, त्याला पर्यायी म्हणून पुनर्चक्रित सांडपाणी वापरण्यात आले. त्यातून मिळत असलेल्या अन्नद्रव्यांमुळे पिकांची केवळ पाण्याची गरज भागते, असे नाही तर खतांचा वापरही कमी करणे शक्य झाले. सोबतच पर्यावरणासाठी त्रासदायक ठरणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची समस्याही कमी होण्यास मदत होणार आहे. जलस्रोत, पाण्याचे प्रमाण, कार्यक्षम वापर या संतुलन राखणे ही अत्यंत मोलाची बाब असून, हरितगृहामध्ये घेतलेल्या या प्रयोगाचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
– जीत चांद,
संशोधक, दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठ.
दक्षिण ऑस्ट्रेलिया येथील अॅडलेड परिसरातील हरितगृहात टोमॅटो उत्पादनामध्ये तुटीच्या सिंचनासह पुनर्चक्रित सांडपाण्याचे सलग दोन वर्षे प्रयोग करण्यात आले. त्यातील किंचित तुटीच्या सिंचनामध्ये (८० टक्के ) उत्पादनावर फारसा परिणाम न होता उत्तम पाणी वापर कार्यक्षमता मिळत असल्याचे दिसून आले. हे निष्कर्ष ‘अॅग्रीकल्चर’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले.
जगातील सर्वात कोरड्या खंडातील सर्वात कोरड्या प्रदेशामध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाचा समावेश होतो. येथील शेतकऱ्यांना दुष्काळ आणि पाण्याच्या कमतरतेचा सामना सातत्याने करावा लागत असल्याने पाण्याविषयी प्रचंड जागरूकता आहे. पिकांच्या विकासासाठी सिंचनाच्या अत्यंत कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतींचा शोध येथे घेतला जात आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठामध्ये नुकताच पाण्याचा दर्जा आणि सिंचनाचे कमी प्रमाण यांचा पिकांच्या विकास, उत्पादन आणि पाण्याच्या एकूण उत्पादकतेवरील परिणामांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये पुनर्चक्रित सांडपाण्याचे निष्कर्ष सर्वात चांगले मिळाले आहेत. आपल्या पीएच. डी. साठी केलेल्या या अभ्यास व निष्कर्षाविषयी माहिती देताना जीत चांद यांनी सांगितले, की दुष्काळग्रस्त आणि कोरड्या भूभागासाठी पाणी ही अत्यंत मोलाची निविष्ठा ठरत आहे. सिंचनासाठी योग्य धोरण ठरवणे, पाण्याच्या नियमित स्रोतांना पर्याय स्रोत तयार करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यात तुटीच्या पाणी पुरवठ्याची संकल्पना शेतकऱ्यांकडून अनेक वेळा परिस्थितीनुरूप वापरली जाते. या संकल्पनेत पाण्याचे प्रमाण कमी ठेवण्यासोबतच पिकांच्या उत्पादकतेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याकडे लक्ष दिले जाते. पिकांच्या नेमक्या संवेदनशील अवस्थांची ओळख पटवून, त्याचवेळी पाण्याचा वापर केला जातो. यातून पाणी वापराची कार्यक्षमता वाढवली जाते.
प्रयोग व निष्कर्ष ः
- उत्तर अॅडलेड पठारी प्रदेशामध्ये एकूण दक्षिण ऑस्ट्रेलियातील टोमॅटो उत्पादनाच्या ९० टक्के टोमॅटो उत्पादन होते. येथे बहुतांश शेती ही हरितगृहामध्ये केली जाते. संपूर्ण ऑस्ट्रेलिया देशातील हरितगृहाचे सर्वांत अधिक प्रमाण याच विभागात आहे. या विभागामध्ये गेल्या दोन वर्षापासून टोमॅटो पिकांतील सिंचनासाठी प्रयोग करण्यात आले. त्यात भूजल, पुनर्चक्रित सांडपाणी, ५० टक्के सांडपाण्याबरोबर मिश्रण यांचा वापर केला. तसेच मातीच्या ओलाव्याची पातळी ६०, ७०, ८० आणि १०० टक्के इतकी ठेवण्यात आली.
- ओलाव्याची पातळी १०० टक्के असताना पिकांची वाढीची पातळी सर्वाधिक होती. मात्र, किंचित ताणाच्या स्थितीमध्ये (८० टक्के) असताना उत्पादनामध्ये लक्षणीय घट न होता सिंचनाची कार्यक्षमता चांगली मिळाली.
- पुनर्चक्रित पाण्याची उपलब्धता चांगली असल्यास शेतीमध्ये त्यांचा वापर दुहेरी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, नेहमीचे सांडपाणी आणि पुनर्चक्रित पाणी यात लक्षणीय फरक आहे, ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
जलस्रोतामध्ये भूजल हे येथील महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, त्याला पर्यायी म्हणून पुनर्चक्रित सांडपाणी वापरण्यात आले. त्यातून मिळत असलेल्या अन्नद्रव्यांमुळे पिकांची केवळ पाण्याची गरज भागते, असे नाही तर खतांचा वापरही कमी करणे शक्य झाले. सोबतच पर्यावरणासाठी त्रासदायक ठरणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची समस्याही कमी होण्यास मदत होणार आहे. जलस्रोत, पाण्याचे प्रमाण, कार्यक्षम वापर या संतुलन राखणे ही अत्यंत मोलाची बाब असून, हरितगृहामध्ये घेतलेल्या या प्रयोगाचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
– जीत चांद,
संशोधक, दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठ.
[ad_2]
Source link