[ad_1]
पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. परभणी, लातूर, पुणे, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या जोरदार सरी पडल्या. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. पावसामुळे पुणे जिल्ह्यात आंबा व कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. इतर भागांतही ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले असून, कांदा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धावपळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात व कोकणातील काही भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे वित्तहानी व जीवितहानी होत असल्याने शेतकऱ्यांपुढे भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सकाळपासून मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात सकाळपासून ढगाळ वातावरणाची झालर पसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची सकाळपासून शेतीकामांसाठी लगबग सुरू झाली होती.
पुणे जिल्ह्यात भीमा खोऱ्यातील वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन मिलिमीटर पाऊस पडला होता. तर विसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २, वरसगाव १९, पानशेत २०, खडकवासला १६, गुंजवणी ५, निरा देवधर १८, नाझरे ७ मिलिमीटर पाऊस पडला. कृष्णा खोऱ्यातील वारणावती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २, दूधगंगा ४, उरमोडी ३६, तारळी ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. याशिवाय खानदेश, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही ऊन व ढगाळ वातावरण अशी स्थिती सुरू आहे. मराठवाड्यात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली होती. दहा वाजेनंतर काही अंशी ऊन पडण्यास सुरूवात झाली होती.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी हजेरी
परभणी जिल्ह्यातील झरी, बोरी मंडळात दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातील जळकोटमध्येही वादळी वारा, विजेचा कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. कोकणातही काही प्रमाणात ऊन असले, तरी घाटमाथ्यावर अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांपुढे चांगलेच संकट उभे राहत आहे. विदर्भातही ऊन व ढग असल्याने चांगलाच उकाडा वाढला होता.
पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. परभणी, लातूर, पुणे, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या जोरदार सरी पडल्या. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. पावसामुळे पुणे जिल्ह्यात आंबा व कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. इतर भागांतही ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले असून, कांदा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धावपळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात व कोकणातील काही भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे वित्तहानी व जीवितहानी होत असल्याने शेतकऱ्यांपुढे भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सकाळपासून मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात सकाळपासून ढगाळ वातावरणाची झालर पसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची सकाळपासून शेतीकामांसाठी लगबग सुरू झाली होती.
पुणे जिल्ह्यात भीमा खोऱ्यातील वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन मिलिमीटर पाऊस पडला होता. तर विसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २, वरसगाव १९, पानशेत २०, खडकवासला १६, गुंजवणी ५, निरा देवधर १८, नाझरे ७ मिलिमीटर पाऊस पडला. कृष्णा खोऱ्यातील वारणावती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २, दूधगंगा ४, उरमोडी ३६, तारळी ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. याशिवाय खानदेश, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही ऊन व ढगाळ वातावरण अशी स्थिती सुरू आहे. मराठवाड्यात सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली होती. दहा वाजेनंतर काही अंशी ऊन पडण्यास सुरूवात झाली होती.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी हजेरी
परभणी जिल्ह्यातील झरी, बोरी मंडळात दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातील जळकोटमध्येही वादळी वारा, विजेचा कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. कोकणातही काही प्रमाणात ऊन असले, तरी घाटमाथ्यावर अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांपुढे चांगलेच संकट उभे राहत आहे. विदर्भातही ऊन व ढग असल्याने चांगलाच उकाडा वाढला होता.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.