[ad_1]
कोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात दुपटीने ऊसगाळप झाले आहे. यंदा २२ एप्रिलअखेर तब्बल १००१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ५३५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. साहजिकच याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही झाला आहे. यंदा साखरेचे उत्पादनही साधरणत: दुप्पट म्हणजे १०५ लाख टन झाले आहे.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा ४५ साखर कारखाने जादा सुरू झाले. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच अन्य भागातील साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम जादा प्रमाणात घेतला. गेल्या वर्षी याच कालावधीत १२ हजार ५३९ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना देय होती. यंदा या कालावधीत २१ हजार ३५९ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देय होती.
गेल्या वर्षी या कालावधीत १२ हजार ५३९ कोटी रुपयांपैकी ११ हजार ३१० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आली होती.
या हंगामात १९ हजार ३०२ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. या वर्षी गाळप वाढल्याने एफआरपीची रक्कम वाढली असली, तरी यंदाही ९०.२९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. अजूनही २ हजार ७३ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे.
८७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ एप्रिल अखेर ८७ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. तर १०१ कारखान्यांनी अद्यापही पूर्ण एफआरपी दिली नाही. ४८ साखर कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली. ३२ कारखान्यांनी ६० ते ८० टक्के तर २१ साखर कारखान्यांनी ० ते ५९ टक्का रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यत १९ कारखान्यांनी आरआरसीअंतर्गत नोटिसा देण्यात आल्या आहेत.
विभागवार गाळप लाख
टन (२२ एप्रिलअखेर)
- कोल्हापूर २३१.०९
- पुणे २२७.८
- सोलापूर १७५.८६
- नगर १६५.८७
- ओरंगाबाद ९६.७४
- नांदेड ९४.०८
- अमरावती ५.८२
- नागपूर ४.२२
कोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात दुपटीने ऊसगाळप झाले आहे. यंदा २२ एप्रिलअखेर तब्बल १००१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ५३५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. साहजिकच याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही झाला आहे. यंदा साखरेचे उत्पादनही साधरणत: दुप्पट म्हणजे १०५ लाख टन झाले आहे.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा ४५ साखर कारखाने जादा सुरू झाले. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच अन्य भागातील साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम जादा प्रमाणात घेतला. गेल्या वर्षी याच कालावधीत १२ हजार ५३९ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना देय होती. यंदा या कालावधीत २१ हजार ३५९ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देय होती.
गेल्या वर्षी या कालावधीत १२ हजार ५३९ कोटी रुपयांपैकी ११ हजार ३१० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आली होती.
या हंगामात १९ हजार ३०२ कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. या वर्षी गाळप वाढल्याने एफआरपीची रक्कम वाढली असली, तरी यंदाही ९०.२९ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. अजूनही २ हजार ७३ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे.
८७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार १५ एप्रिल अखेर ८७ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. तर १०१ कारखान्यांनी अद्यापही पूर्ण एफआरपी दिली नाही. ४८ साखर कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली. ३२ कारखान्यांनी ६० ते ८० टक्के तर २१ साखर कारखान्यांनी ० ते ५९ टक्का रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यत १९ कारखान्यांनी आरआरसीअंतर्गत नोटिसा देण्यात आल्या आहेत.
विभागवार गाळप लाख
टन (२२ एप्रिलअखेर)
- कोल्हापूर २३१.०९
- पुणे २२७.८
- सोलापूर १७५.८६
- नगर १६५.८७
- ओरंगाबाद ९६.७४
- नांदेड ९४.०८
- अमरावती ५.८२
- नागपूर ४.२२
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.