[ad_1]
सांगली : पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजना गेल्या दोन दिवसापूर्वी सुरु केली आहे. या योजनेतील टप्प्या टप्प्याने पंपांची संख्या वाढली असून सध्या ३४ पंपांनी पाणी कृष्णेतून उचलून पुढे दुष्काळी भागातील तलाव लवकरात लवकर भरुन देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने सुरु केले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. कोयना धरणाक्षेत्रात देखील संततधार पावसाने कोयना धरण आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीला पूर आला. पूराचे वाहून जाणारेपाणी दुष्काळी भागात द्यावे, याची मागणी अनेक वर्षापासून केली जाते.
मात्र, यंदा मार्च महिन्यात पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात देण्याबाबत बैठका झाल्या. त्यावर पाटबंधारे विभागाने नियोजन सुरु केले. दुष्काळी भागातील तलाव भरुन देण्यासाठी सोमवारपासून म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरु केली. सुरवातीला दोन पंप सुरु करुन पाणी उपसा सुरु होता. त्यानंतर टप्प्या टप्प्याने पंपांची संख्या वाढविण्यात आली.
सध्या ३४ पंपांनी पाणी उपसा सुरु आहे. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज या तालुक्यातील या योजनाचे लाभ क्षेत्रात असलेल्या तलाव पाण्याने भरुन घेतले जाणार आहेत. त्यानंतर पुढे सोलापूर जिल्ह्यातील देखील पाणी सोडले जाणार आहे. सध्या पाटबंधारे विभागाने लाभ क्षेत्रातील कोणत्या तलावात पाणी शिल्लक आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. पुराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात द्या ही मागणी अनेक वर्षापासून आहे.
त्यासाठी शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी आंदोलने देखील केली. परंतू लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाकडून नेहमी दुर्लक्ष झाले. परंतू यंदा पुराचे पाणी दुष्काळी भागात पोहोचत असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी उपलब्ध होत असल्याने पाणी टंचाई भासणार नाही.
सांगली : पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजना गेल्या दोन दिवसापूर्वी सुरु केली आहे. या योजनेतील टप्प्या टप्प्याने पंपांची संख्या वाढली असून सध्या ३४ पंपांनी पाणी कृष्णेतून उचलून पुढे दुष्काळी भागातील तलाव लवकरात लवकर भरुन देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने सुरु केले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. कोयना धरणाक्षेत्रात देखील संततधार पावसाने कोयना धरण आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीला पूर आला. पूराचे वाहून जाणारेपाणी दुष्काळी भागात द्यावे, याची मागणी अनेक वर्षापासून केली जाते.
मात्र, यंदा मार्च महिन्यात पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात देण्याबाबत बैठका झाल्या. त्यावर पाटबंधारे विभागाने नियोजन सुरु केले. दुष्काळी भागातील तलाव भरुन देण्यासाठी सोमवारपासून म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरु केली. सुरवातीला दोन पंप सुरु करुन पाणी उपसा सुरु होता. त्यानंतर टप्प्या टप्प्याने पंपांची संख्या वाढविण्यात आली.
सध्या ३४ पंपांनी पाणी उपसा सुरु आहे. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज या तालुक्यातील या योजनाचे लाभ क्षेत्रात असलेल्या तलाव पाण्याने भरुन घेतले जाणार आहेत. त्यानंतर पुढे सोलापूर जिल्ह्यातील देखील पाणी सोडले जाणार आहे. सध्या पाटबंधारे विभागाने लाभ क्षेत्रातील कोणत्या तलावात पाणी शिल्लक आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. पुराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात द्या ही मागणी अनेक वर्षापासून आहे.
त्यासाठी शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी आंदोलने देखील केली. परंतू लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभागाकडून नेहमी दुर्लक्ष झाले. परंतू यंदा पुराचे पाणी दुष्काळी भागात पोहोचत असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी उपलब्ध होत असल्याने पाणी टंचाई भासणार नाही.
[ad_2]
Source link