[ad_1]
देवणी, जि. लातूर : तालुक्यात बुधवारी (ता. ६) सायंकाळी सातनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिके आडवी झाली. तीन तास झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले.
बुधवारी तालुक्यातील वलांडी महसूल मंडळात १०८, देवणी मंडळात ५०, तर बोरोळ मंडळात ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी ६३.६६ मि.मी पाऊस झाला. वलांडीसह कवठाळ, जवळगा, टाकळी, कोरेवाडी, धनेगाव भागात जोरदार वाऱ्याने ज्वारीचे पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. सध्या उसाची तोड सुरू असून सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस तरी तोडणी झालेला ऊस फडाबाहेर निघणे कठीण झाले आहे.
तालुक्यात मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजासह बागायती पिकांची लागवड केली. अतिपावसाने सरीत पाणी थांबल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. सर्वच भागात तुरीची कापणी पूर्णत्वास आली आहे. पावसाने तुरीचे कापलेले पीक पाण्यात गेले आहे. वलाडी भागातील सर्वच ओढे, नाल्यांना पाणी आले. हरभरा पिकामध्ये पाणी साचल्याने मर रोगाचा धोका निर्माण झाला.
चालू हंगामात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे दोन एकर क्षेत्रावर टरबूज, एक एकर क्षेत्रावर खरबूज यांसह केळी, कोथिंबिरीची लागवड केली आहे. बुधवारी झालेल्या पावसाने खरबुजाच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गुरुवारी दिवसभर मजूर लावून पाणी रानाबाहेर काढले. अतिपाण्यामुळे टरबूज, खरबूज पिकांना रोगाचा धोका आहे.
– सुरेंद्र आंबुलगे, वलांडी
तालुक्यात दक्षीण भागात झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारीचे पीक पूर्णतः आडवे झाले आहे. शिवाय, तुरीच्या कापणी झालेल्या पिकात पाणी साचले. त्यामुळे पीक वाया जाणार आहे. हरभरा पिकामध्ये पाणी साचल्याने पिके पिवळी पडून मर रोगाची भीती आहे.
– संभाजी पाटील, शेतकरी
देवणी, जि. लातूर : तालुक्यात बुधवारी (ता. ६) सायंकाळी सातनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिके आडवी झाली. तीन तास झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले.
बुधवारी तालुक्यातील वलांडी महसूल मंडळात १०८, देवणी मंडळात ५०, तर बोरोळ मंडळात ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी ६३.६६ मि.मी पाऊस झाला. वलांडीसह कवठाळ, जवळगा, टाकळी, कोरेवाडी, धनेगाव भागात जोरदार वाऱ्याने ज्वारीचे पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. सध्या उसाची तोड सुरू असून सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस तरी तोडणी झालेला ऊस फडाबाहेर निघणे कठीण झाले आहे.
तालुक्यात मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजासह बागायती पिकांची लागवड केली. अतिपावसाने सरीत पाणी थांबल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. सर्वच भागात तुरीची कापणी पूर्णत्वास आली आहे. पावसाने तुरीचे कापलेले पीक पाण्यात गेले आहे. वलाडी भागातील सर्वच ओढे, नाल्यांना पाणी आले. हरभरा पिकामध्ये पाणी साचल्याने मर रोगाचा धोका निर्माण झाला.
चालू हंगामात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे दोन एकर क्षेत्रावर टरबूज, एक एकर क्षेत्रावर खरबूज यांसह केळी, कोथिंबिरीची लागवड केली आहे. बुधवारी झालेल्या पावसाने खरबुजाच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गुरुवारी दिवसभर मजूर लावून पाणी रानाबाहेर काढले. अतिपाण्यामुळे टरबूज, खरबूज पिकांना रोगाचा धोका आहे.
– सुरेंद्र आंबुलगे, वलांडी
तालुक्यात दक्षीण भागात झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारीचे पीक पूर्णतः आडवे झाले आहे. शिवाय, तुरीच्या कापणी झालेल्या पिकात पाणी साचले. त्यामुळे पीक वाया जाणार आहे. हरभरा पिकामध्ये पाणी साचल्याने पिके पिवळी पडून मर रोगाची भीती आहे.
– संभाजी पाटील, शेतकरी
[ad_2]
Source link