[ad_1]
मुंबई ः अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत बुधवारी (ता.९) पुन्हा एकदा जोरदार गोंधळ झाला. गोंधळात अध्यक्षांनी कामकाज पुकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला. विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी एकदा, तर विधान परिषदेचे कामकाज पाच वेळा तहकूब करण्यात आले.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे जोरदार गोंधळ झाला. मात्र त्यांनी माफी मागितली. त्यांचे विधान कामकाजातून काढून टाकण्यात आले.
विधानसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत मलिक यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर देखील मलिकांविरोधात घोषणाबाजी केली. विधान भवनातील प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर कामकाज सुरू करण्याअगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
‘‘नवाब मलिक कारागृहात असूनही ते मंत्रिपदावर कसे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा’’, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
विधान परिषदेत गोंधळ; पडळकरांची माफी
विधान परिषदेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा सुरू होती. या वेळी पडळकर यांनी देसाई यांनी आपल्याला आरोपी केले, असा उल्लेख केला. मात्र त्यावर आक्षेप घेत मी आरोपी करणारा कोण? आरोपी कोर्ट करत असते, असे त्यांनी सांगितले. या वेळी गोंधळ सुरू झाल्याने सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा १०, तर दुसऱ्यांना सात मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर पडळकर यांनी माफी मागितली. दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांनी राजीमाना द्यावा, अशी मागणी केली. ही मागणी लावून धरत विरोधी सदस्यांनी पुन्हा गोंधळाला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा एकदा १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले. दुपारी १२.२० वाजता भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाले.
मुंबई ः अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत बुधवारी (ता.९) पुन्हा एकदा जोरदार गोंधळ झाला. गोंधळात अध्यक्षांनी कामकाज पुकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला. विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी एकदा, तर विधान परिषदेचे कामकाज पाच वेळा तहकूब करण्यात आले.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे जोरदार गोंधळ झाला. मात्र त्यांनी माफी मागितली. त्यांचे विधान कामकाजातून काढून टाकण्यात आले.
विधानसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घालत मलिक यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर देखील मलिकांविरोधात घोषणाबाजी केली. विधान भवनातील प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर कामकाज सुरू करण्याअगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
‘‘नवाब मलिक कारागृहात असूनही ते मंत्रिपदावर कसे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा’’, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
विधान परिषदेत गोंधळ; पडळकरांची माफी
विधान परिषदेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधी सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा सुरू होती. या वेळी पडळकर यांनी देसाई यांनी आपल्याला आरोपी केले, असा उल्लेख केला. मात्र त्यावर आक्षेप घेत मी आरोपी करणारा कोण? आरोपी कोर्ट करत असते, असे त्यांनी सांगितले. या वेळी गोंधळ सुरू झाल्याने सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा १०, तर दुसऱ्यांना सात मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर पडळकर यांनी माफी मागितली. दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांनी राजीमाना द्यावा, अशी मागणी केली. ही मागणी लावून धरत विरोधी सदस्यांनी पुन्हा गोंधळाला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा एकदा १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले. दुपारी १२.२० वाजता भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाले.
[ad_2]
Source link