[ad_1]
शिराढोण, जि. उस्मानाबाद ः दोन लाख रुपयांपेक्षा जादा थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफीची रक्कम तातडीने द्यावी. तसेच नियमितपणे कर्ज बाकी भरणाऱ्या चालू बाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
परतीच्या पावसाने उस्मानाबादसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. खरिपातील सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला इत्यादी पिके परतीच्या पावसाने नेस्तनाबूत केली.
सध्या शेतकरी उघड्यावर आहे. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा याची विवंचना शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. या सोबतच पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
आघाडी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. मात्र, दोन लाख रुपये पेक्षा जादा असलेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना कधी देणार? या मधे राज्य सरकारने असे सांगितले होते की दोन लाख रुपये पेक्षा जादा असलेली कर्जाची रक्कम शेतकरी भरणार आणि दोन लाख रुपये सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, अशी ही एक रकमी कर्ज परतफेड योजनेची राज्य शासनाने जाहीर केले होते. तसेच नियमितपणे कर्ज भरणाऱ्या चालू बाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंतचे सानुग्रह अनुदान द्यावे अशीही शेतकऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी आहे.
राज्य शासनाने असे सांगितले होते की दोन लाख रुपये पेक्षा जादा असलेली कर्जाची रक्कम शेतकरी भरणार आणि दोन लाख रुपये सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, अशी ही एक रकमी कर्ज परतफेड योजना राज्य शासनाने जाहीर केले होते. तसेच नियमितपणे कर्ज भरणाऱ्या चालू बाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंतचे सानुग्रह अनुदान द्यावे
– पद्माकर पाटील, सरपंच
शिराढोण, जि. उस्मानाबाद ः दोन लाख रुपयांपेक्षा जादा थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज माफीची रक्कम तातडीने द्यावी. तसेच नियमितपणे कर्ज बाकी भरणाऱ्या चालू बाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
परतीच्या पावसाने उस्मानाबादसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. खरिपातील सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला इत्यादी पिके परतीच्या पावसाने नेस्तनाबूत केली.
सध्या शेतकरी उघड्यावर आहे. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा याची विवंचना शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. या सोबतच पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
आघाडी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. मात्र, दोन लाख रुपये पेक्षा जादा असलेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना कधी देणार? या मधे राज्य सरकारने असे सांगितले होते की दोन लाख रुपये पेक्षा जादा असलेली कर्जाची रक्कम शेतकरी भरणार आणि दोन लाख रुपये सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, अशी ही एक रकमी कर्ज परतफेड योजनेची राज्य शासनाने जाहीर केले होते. तसेच नियमितपणे कर्ज भरणाऱ्या चालू बाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंतचे सानुग्रह अनुदान द्यावे अशीही शेतकऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी आहे.
राज्य शासनाने असे सांगितले होते की दोन लाख रुपये पेक्षा जादा असलेली कर्जाची रक्कम शेतकरी भरणार आणि दोन लाख रुपये सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, अशी ही एक रकमी कर्ज परतफेड योजना राज्य शासनाने जाहीर केले होते. तसेच नियमितपणे कर्ज भरणाऱ्या चालू बाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंतचे सानुग्रह अनुदान द्यावे
– पद्माकर पाटील, सरपंच
[ad_2]
Source link