[ad_1]
भंडारा : महाविकास आघाडी शेतकरी हितासाठी बांधील आहे. शासनाने धान उत्पादकांचे हित लक्षात घेता सातशे रुपयांचा बोनस जाहीर केला होता. एप्रिल महिन्यात तो देण्यात येणार असून याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांचे शेकडो पोती धान मिलिंगच्या प्रतीक्षेत आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या दबावामुळे धानाचे मिलिंग करता आले नाही. आता ही अनेक शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. धानाची उचल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तांदळाच्या उतारा संदर्भात हे केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोषित करण्यात आलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात कर्मचारी पदभरती संदर्भात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीनही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे. विरोधक मात्र नाहक आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले? याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. कुणाच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाही. फक्त घोषणा व जुमलेबाजी करून वेळ मारून नेण्यात आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात जो कोणी अधिकारी दोषी असेल त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपशासित राज्यात कोरोना चाचण्या नगण्य आहेत. विरोधक मात्र मानवी जिवाच्या विषयावर राजकारण करीत असून, लोक मरत आहेत तर मरू द्या, या भूमिकेत असल्याचा घणाघाती आरोप देखील पटोले यांनी केला.
मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही
विजेच्या देयकाचा भरणा केल्यास त्यापोटी वीज वितरण कंपनीचा तोटा कमी होणार आहे. मात्र, त्यानंतर वीज ग्राहकांना कुठलीही सुविधा व त्रास होता कामा नये. आपण ऊर्जा खात्याच्या संदर्भात मंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही. मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्याने केव्हाही मंत्रिपद मला मिळू शकते. मात्र त्या संदर्भात अद्याप विचार केला नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
भंडारा : महाविकास आघाडी शेतकरी हितासाठी बांधील आहे. शासनाने धान उत्पादकांचे हित लक्षात घेता सातशे रुपयांचा बोनस जाहीर केला होता. एप्रिल महिन्यात तो देण्यात येणार असून याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांचे शेकडो पोती धान मिलिंगच्या प्रतीक्षेत आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या दबावामुळे धानाचे मिलिंग करता आले नाही. आता ही अनेक शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. धानाची उचल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तांदळाच्या उतारा संदर्भात हे केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोषित करण्यात आलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात कर्मचारी पदभरती संदर्भात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीनही पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे. विरोधक मात्र नाहक आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले? याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. कुणाच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाही. फक्त घोषणा व जुमलेबाजी करून वेळ मारून नेण्यात आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात जो कोणी अधिकारी दोषी असेल त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपशासित राज्यात कोरोना चाचण्या नगण्य आहेत. विरोधक मात्र मानवी जिवाच्या विषयावर राजकारण करीत असून, लोक मरत आहेत तर मरू द्या, या भूमिकेत असल्याचा घणाघाती आरोप देखील पटोले यांनी केला.
मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही
विजेच्या देयकाचा भरणा केल्यास त्यापोटी वीज वितरण कंपनीचा तोटा कमी होणार आहे. मात्र, त्यानंतर वीज ग्राहकांना कुठलीही सुविधा व त्रास होता कामा नये. आपण ऊर्जा खात्याच्या संदर्भात मंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही. मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्याने केव्हाही मंत्रिपद मला मिळू शकते. मात्र त्या संदर्भात अद्याप विचार केला नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.