[ad_1]
शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर महिन्यांत शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापूस, मका, कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी जिल्ह्यात १० कोटी ४९ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण लवकर होईल, अशी माहिती आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील शेतीवर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तसेच शिंदखेडा व शिरपूर तहसील कार्यालयात प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधींसमवेत आढावा बैठक घेतली व अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार संबंधित यंत्रणेने राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. त्यावरून धुळे जिल्ह्यासाठी १० कोटी ४९ लाख २६ हजार रुपये निधी दिला. त्यात शिंदखेडा व शिरपूर तालुक्यासाठी पाच कोटी ९७ लाख निधी उपलब्ध होणार आहे.
धुळे जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर या महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिराईत पिकासाठी हेक्टरी दहा हजार व बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी २५ हजारांप्रमाणे मदत मंजूर झाली. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित होईल.
या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असताना, शासनाने केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर महिन्यांत शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापूस, मका, कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी जिल्ह्यात १० कोटी ४९ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण लवकर होईल, अशी माहिती आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील शेतीवर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तसेच शिंदखेडा व शिरपूर तहसील कार्यालयात प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधींसमवेत आढावा बैठक घेतली व अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार संबंधित यंत्रणेने राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. त्यावरून धुळे जिल्ह्यासाठी १० कोटी ४९ लाख २६ हजार रुपये निधी दिला. त्यात शिंदखेडा व शिरपूर तालुक्यासाठी पाच कोटी ९७ लाख निधी उपलब्ध होणार आहे.
धुळे जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर या महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिराईत पिकासाठी हेक्टरी दहा हजार व बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी २५ हजारांप्रमाणे मदत मंजूर झाली. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित होईल.
या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असताना, शासनाने केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
[ad_2]
Source link