[ad_1]
बुलडाणा : संभाव्य वैनगंगा नदीचे नळगंगा परिक्षेत्रात येणारे पाणी तसेच घाटाखालील पूर्णा नदीवरील जिगाव प्रकल्पातील पाणी उपसा सिंचन (लिफ्ट इरिशेन) च्या माध्यमातून घाटावरील पैनगंगा नदीच्या खोऱ्यात जाण्यासाठी मर्दडीच्या घाटात सोडण्यात येण्यासाठी नवीन प्रकल्प तथा सिंचन योजना निर्माण करण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की नदीजोड प्रकल्प हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. भविष्यात वैनगंगा नदीचे पाणी कालव्याव्दारे नळगंगा परिक्षेत्रात येणार आहे. ८० टक्के पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. घाटाखालील नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्प निर्माण होत असून यामुळे संभाव्य वैनगंगा नदीचे नळगंगा परिक्षेत्रात येणारे पाणी तसेच घाटाखाली पूर्णा नदीवरील जिगाव प्रकल्पातील पाणी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून घाटावरील पैनगंगा नदीच्या खोऱ्यात जाण्यासाठी मर्दडीच्या खोऱ्यात जाण्यासाठी मर्दडीच्या घाटात सोडण्यात येण्यासाठी नवीन प्रकल्प तथा सिंचन योजना निर्माण करणे गरजेचे आहे.
तसेच, सदर योजना राबविल्यास त्यापासून होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत खर्च हा अत्यंत कमी लागणार आहे. त्याचप्रमाणे पैनगंगा व खडकपूर्णा या दोन्ही नद्या बाराही महिने सिंचनाच्या व पिण्यासाठी पाणी वापराच्या दृष्टीने वाहत्या राहतील. सिंचन योजना निर्माण करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते अॅड. वामनदराव चटप यांनी केली.
बुलडाणा : संभाव्य वैनगंगा नदीचे नळगंगा परिक्षेत्रात येणारे पाणी तसेच घाटाखालील पूर्णा नदीवरील जिगाव प्रकल्पातील पाणी उपसा सिंचन (लिफ्ट इरिशेन) च्या माध्यमातून घाटावरील पैनगंगा नदीच्या खोऱ्यात जाण्यासाठी मर्दडीच्या घाटात सोडण्यात येण्यासाठी नवीन प्रकल्प तथा सिंचन योजना निर्माण करण्यात यावी, अशी मागणी स्वतंत्र विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की नदीजोड प्रकल्प हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. भविष्यात वैनगंगा नदीचे पाणी कालव्याव्दारे नळगंगा परिक्षेत्रात येणार आहे. ८० टक्के पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. घाटाखालील नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्प निर्माण होत असून यामुळे संभाव्य वैनगंगा नदीचे नळगंगा परिक्षेत्रात येणारे पाणी तसेच घाटाखाली पूर्णा नदीवरील जिगाव प्रकल्पातील पाणी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून घाटावरील पैनगंगा नदीच्या खोऱ्यात जाण्यासाठी मर्दडीच्या खोऱ्यात जाण्यासाठी मर्दडीच्या घाटात सोडण्यात येण्यासाठी नवीन प्रकल्प तथा सिंचन योजना निर्माण करणे गरजेचे आहे.
तसेच, सदर योजना राबविल्यास त्यापासून होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत खर्च हा अत्यंत कमी लागणार आहे. त्याचप्रमाणे पैनगंगा व खडकपूर्णा या दोन्ही नद्या बाराही महिने सिंचनाच्या व पिण्यासाठी पाणी वापराच्या दृष्टीने वाहत्या राहतील. सिंचन योजना निर्माण करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते अॅड. वामनदराव चटप यांनी केली.
[ad_2]
Source link