[ad_1]
नागपूर : शेतमाल खरेदी व्यवहारात व्यापाऱ्याकडून फसवणुकीची देशातील पहिली तक्रार भटाने येथील शेतकऱ्याने केली होती. याप्रकरणी मंगळवारी (ता. ६) झालेल्या पहिल्या सुनावणीत सोमवारी (ता. २६) पैसे देणार असल्याचे व्यापाऱ्याने आपल्या लेखी जवाबात म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यातील भटाने गावातून मध्य प्रदेशातील सुभाष व अरुण वाणी या व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केली होती. जितेंद्र भोई या शेतकऱ्याने २७० क्विंटल ९५ किलो भुईमूग शेंगांची विक्री केली. त्यापोटी व्यापाऱ्याने त्यांना तीन लाख ३२ हजार ६१७ रुपयांचा धनादेश दिला. मात्र, बँकेत पैसे नसल्याने तो वटलाच नाही. या विरोधात शेतकरी जितेंद्र भोई यांनी केंद्र सरकारच्या नव्या अध्यादेशानुसार उपविभागीय अधिकारी पानसेमल (मध्य प्रदेश) यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. मंगळवारी (ता. ६) या प्रकरणात पहिली सुनावणी झाली. यावेळी शेतकरी भोई यांच्यासह व्यापारी सुभाष व अरूण वाणी या दोघांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात जवाबाच्या माध्यमातून सादर केले. सोमवारपर्यंत या शेतकऱ्याचे पैसे येणार असल्याचे या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीत काय आदेश होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अरुण व सुभाष वाणी या व्यापाऱ्यांनी आमचे तीन लाख रुपयाचे चुकारे दिले नाही. याप्रकरणी नव्या अध्यादेशानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे. आज झालेल्या सुनावणीत सोमवार (ता. २६) पर्यंत पैसे देणार असल्याचे व्यापाऱ्याने लेखी जबाबात म्हटले आहे.
– जितेंद्र भोई, भटाने, ता. शिरपूर, जि. धुळे.
नागपूर : शेतमाल खरेदी व्यवहारात व्यापाऱ्याकडून फसवणुकीची देशातील पहिली तक्रार भटाने येथील शेतकऱ्याने केली होती. याप्रकरणी मंगळवारी (ता. ६) झालेल्या पहिल्या सुनावणीत सोमवारी (ता. २६) पैसे देणार असल्याचे व्यापाऱ्याने आपल्या लेखी जवाबात म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यातील भटाने गावातून मध्य प्रदेशातील सुभाष व अरुण वाणी या व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केली होती. जितेंद्र भोई या शेतकऱ्याने २७० क्विंटल ९५ किलो भुईमूग शेंगांची विक्री केली. त्यापोटी व्यापाऱ्याने त्यांना तीन लाख ३२ हजार ६१७ रुपयांचा धनादेश दिला. मात्र, बँकेत पैसे नसल्याने तो वटलाच नाही. या विरोधात शेतकरी जितेंद्र भोई यांनी केंद्र सरकारच्या नव्या अध्यादेशानुसार उपविभागीय अधिकारी पानसेमल (मध्य प्रदेश) यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. मंगळवारी (ता. ६) या प्रकरणात पहिली सुनावणी झाली. यावेळी शेतकरी भोई यांच्यासह व्यापारी सुभाष व अरूण वाणी या दोघांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात जवाबाच्या माध्यमातून सादर केले. सोमवारपर्यंत या शेतकऱ्याचे पैसे येणार असल्याचे या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीत काय आदेश होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अरुण व सुभाष वाणी या व्यापाऱ्यांनी आमचे तीन लाख रुपयाचे चुकारे दिले नाही. याप्रकरणी नव्या अध्यादेशानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे. आज झालेल्या सुनावणीत सोमवार (ता. २६) पर्यंत पैसे देणार असल्याचे व्यापाऱ्याने लेखी जबाबात म्हटले आहे.
– जितेंद्र भोई, भटाने, ता. शिरपूर, जि. धुळे.
[ad_2]
Source link