[ad_1]
नांदेड ः ‘‘लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यात येते. यंदा २८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ३०० जनावरांना लाळ्या-खुरकूत लस देण्यात आली,’’ अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या १७८, तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सहा अशा एकूण १८४ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून हे लसीकरण पूर्ण केले आहे. लसीकरणासोबतच पशुपालकांना जनावरांच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केले.
डॉ. रत्नपारखी म्हणाले, ‘‘लाळ्या-खुरकुताची लागण झाल्यानंतर जनावर हे शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही. पाणी पिणे बंद करते. तर दुभते जनावर असेल, तर दुधाचे प्रमाणही कमी होते. या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जिभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात. गाभण जनावराच्या मागच्या पायात हे फोड आले, तर अपंगत्वसुद्धा येऊ शकते. या आजाराची साथच सुरू असेल, तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. आजारी जनावराचा चारा निरोगी जनावराला देऊ नये. पाण्याची स्वतंत्र सोय करावी. अजारग्रस्त जनावरे बांधलेली जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावीत.जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही. लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे’’, असे डॉ. रत्नपारखी म्हणाले.
जिल्ह्यातील जनावरांना सध्या कोणताही संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव नाही. परंतु पशुपालकांनी वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. या सोबतच जनावरांचे टंगिंगही करून घ्यावे.
– डॉ. मधुसूदन रत्नपारखी, पशुसंवर्धन उपायुक्त, नांदेड
नांदेड ः ‘‘लाळ्या खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचे लसीकरण करण्यात येते. यंदा २८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ७९ हजार ३०० जनावरांना लाळ्या-खुरकूत लस देण्यात आली,’’ अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या १७८, तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सहा अशा एकूण १८४ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून हे लसीकरण पूर्ण केले आहे. लसीकरणासोबतच पशुपालकांना जनावरांच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केले.
डॉ. रत्नपारखी म्हणाले, ‘‘लाळ्या-खुरकुताची लागण झाल्यानंतर जनावर हे शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही. पाणी पिणे बंद करते. तर दुभते जनावर असेल, तर दुधाचे प्रमाणही कमी होते. या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जिभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते. पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात. गाभण जनावराच्या मागच्या पायात हे फोड आले, तर अपंगत्वसुद्धा येऊ शकते. या आजाराची साथच सुरू असेल, तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. आजारी जनावराचा चारा निरोगी जनावराला देऊ नये. पाण्याची स्वतंत्र सोय करावी. अजारग्रस्त जनावरे बांधलेली जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावीत.जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही. लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे’’, असे डॉ. रत्नपारखी म्हणाले.
जिल्ह्यातील जनावरांना सध्या कोणताही संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव नाही. परंतु पशुपालकांनी वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. या सोबतच जनावरांचे टंगिंगही करून घ्यावे.
– डॉ. मधुसूदन रत्नपारखी, पशुसंवर्धन उपायुक्त, नांदेड
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.