[ad_1]
पुणे : पश्चिम बंगाल ते विदर्भ व ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगड या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. यामुळे विदर्भातील नागपूर व परिसरात गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी काढणीला आलेल्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार झाला होता. मात्र मागील काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्याच्या परिसरात असलेल्या चक्रीय वाऱ्याची स्थिती ही मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात सरकली आहे. यामुळे मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे झाले होते. त्यातच उत्तर केरळ ते उत्तर मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती कोमोरीन परिसर ते दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण तमिळनाडू व केरळ परिसरापर्यंत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.
आज आणि उद्या राज्यात असलेली काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती निवळणार आहे. त्यामुळे येते चार ते पाच दिवस उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढणार आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १३.१ अंश सेल्सिअसची किमान, तर ब्रह्मपुरी येथे ३९.१ अंश सेल्सिअसची कमाल तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक भागांत सकाळपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच होऊ लागली आहे. विदर्भात प्रामुख्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्या, तरी इतर उर्वरित भागात उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे.
शनिवारी (ता.१३) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान, कंसात कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) २२.२ (३३.४)
- ठाणे १९.८ (३५.२)
- अलिबाग २२.७ (३०.९)
- रत्नागिरी २२.५ (३२.४)
- डहाणू २३.२ (३१)
- पुणे १६.६ (३६.६)
- जळगाव २१ (३७.९)
- कोल्हापूर २२ (३५.१)
- महाबळेश्वर १८ (३१.५)
- मालेगाव २०.२ (३८.६)
- नाशिक १६.६ (३४.७)
- निफाड १३.१ (३४.२)
- सांगली २२.६ (३६.४)
- सातारा २३ (३५.७)
- सोलापूर १८.७ (३८.२)
- औरंगाबाद २२.४ (३६.१)
- बीड १९.८ (३८.७)
- परभणी २०.४ (३७.४)
- परभणी कृषी विद्यापीठ १७.५ (३४.४)
- नांदेड २१ (३९)
- उस्मानाबाद १८ (३७.१)
- अकोला २१.४ (३९.०)
- अमरावती २१.१ (३८.२)
- बुलडाणा २०.५ (३७.२)
- चंद्रपूर १९.२ (३९)
- गोंदिया १९ (३६)
- नागपूर २०.२ (३७.२)
- वर्धा १९.६ (३८.४)
- यवतमाळ २१.५ (३८.७)
पुणे : पश्चिम बंगाल ते विदर्भ व ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगड या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. यामुळे विदर्भातील नागपूर व परिसरात गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी काढणीला आलेल्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार झाला होता. मात्र मागील काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्याच्या परिसरात असलेल्या चक्रीय वाऱ्याची स्थिती ही मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात सरकली आहे. यामुळे मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे झाले होते. त्यातच उत्तर केरळ ते उत्तर मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाच्या क्षेत्राची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती कोमोरीन परिसर ते दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण तमिळनाडू व केरळ परिसरापर्यंत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.
आज आणि उद्या राज्यात असलेली काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती निवळणार आहे. त्यामुळे येते चार ते पाच दिवस उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढणार आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १३.१ अंश सेल्सिअसची किमान, तर ब्रह्मपुरी येथे ३९.१ अंश सेल्सिअसची कमाल तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक भागांत सकाळपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच होऊ लागली आहे. विदर्भात प्रामुख्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्या, तरी इतर उर्वरित भागात उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागला आहे.
शनिवारी (ता.१३) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान, कंसात कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) २२.२ (३३.४)
- ठाणे १९.८ (३५.२)
- अलिबाग २२.७ (३०.९)
- रत्नागिरी २२.५ (३२.४)
- डहाणू २३.२ (३१)
- पुणे १६.६ (३६.६)
- जळगाव २१ (३७.९)
- कोल्हापूर २२ (३५.१)
- महाबळेश्वर १८ (३१.५)
- मालेगाव २०.२ (३८.६)
- नाशिक १६.६ (३४.७)
- निफाड १३.१ (३४.२)
- सांगली २२.६ (३६.४)
- सातारा २३ (३५.७)
- सोलापूर १८.७ (३८.२)
- औरंगाबाद २२.४ (३६.१)
- बीड १९.८ (३८.७)
- परभणी २०.४ (३७.४)
- परभणी कृषी विद्यापीठ १७.५ (३४.४)
- नांदेड २१ (३९)
- उस्मानाबाद १८ (३७.१)
- अकोला २१.४ (३९.०)
- अमरावती २१.१ (३८.२)
- बुलडाणा २०.५ (३७.२)
- चंद्रपूर १९.२ (३९)
- गोंदिया १९ (३६)
- नागपूर २०.२ (३७.२)
- वर्धा १९.६ (३८.४)
- यवतमाळ २१.५ (३८.७)
[ad_2]
Source link