[ad_1]
नारळ हे बागायती पीक आहे. पाण्याची गरज ही जमिनीचा मगदूर आणि झाडाचे वय यावर अवलंबून असते. माती परीक्षण आणि झाडाचे वय लक्षात घेऊन शिफारशीत खतमात्रा दिल्यास नारळाची गळ होत नाही.
नारळाची लागवड ही ५ ते १० गुंठे ते एकर बागेच्या स्वरूपात, घराशेजारी १ ते ५ झाडे आणि काही ठिकाणी कुंपणाच्याकडेने, रस्त्याचे बाजूने केली जात आहे. नारळाचे झाड लागवड केल्यानंतर ६० ते ८० वर्षे जगून चांगल्या प्रकारे उत्पादन देते. परंतु यापासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सातत्याने योग्यप्रकारे मशागत करणे गरजेचे आहे. या मशागतीत खत आणि पाणी यांचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे.
नारळ फळगळीवर उपाय
- नारळ जाती आणि नारळ झाडाचे शरीरविज्ञानशास्त्र लक्षात घेणे गरजेचे आहे. जातीनुसार नारळाला फळधारणा ४ ते ७ वर्षांत सुरू होते. त्यानंतर मात्र नारळ झाडाला दर महिन्याला एक पान आणि एक फुलोरा (पोय) येत असते. यामध्ये हवामानाच्या विविध घटकांचा परिणाम होत असतो त्यामुळे या दिवसामध्ये देखील फरक पडत असतो.
- फुलोऱ्याला फळ लागणे हे सर्वस्वी आपल्या मशागतीवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे जातीनुसार फळधारणा सुरू झाल्यावर पहिल्या ६ ते ७ फुलोऱ्यांना (पोय) अनेक वेळा अजिबात फळे लागत नाही तर काही वेळा एखादं दुसरे फळ लागते. त्याचप्रमाणे फुलाचा तुरा बाहेर पडल्यापासून पहिल्या दोन महिन्यात गळीचे प्रमाण जास्त असते. फळधारणा झाल्यापासून दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यामध्ये गळीचे प्रमाण उच्चांक गाठते. कमी जास्त प्रमाणात वर्षभर फळगळ होत असते.
- फुलोऱ्याचा गर्भधारणा कालावधी हा ३२ ते ३६ महिन्यांचा असतो. त्यामुळे या कालावधीत त्याच्यावर होणारे निसर्गातील, वातावरणातील बदल महत्त्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे याच कालावधीत अन्न आणि पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. यासाठी लागत्या नारळ झाडांना जाती आणि शिफारशीनुसार खते द्यावीत.
- खते तीन हप्त्यामध्ये (जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी) विभागून द्यावीत. त्यासाठी शिफारशीत खतांपैकी १/३ नत्र आणि पालाश तर स्फुरद आणि कंपोस्ट / शेणखत संपूर्णपणे जून महिन्यात एकाच वेळी द्यावे.
- शिल्लक २/३ नत्र आणि पालाश खतांची मात्रा समान हप्त्यात विभागून ऑक्टोबर आणि फेब्रुवारी मध्ये द्यावी.
- एरिओफाईड माईटस् या किडीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १० किलो निंबोळी पेंड दोन समान हप्त्यामध्ये विभागून द्यावी.
- नारळ पिकात नत्र आणि पालाश अन्नद्रव्यांची गरज अनन्य साधारण आहे. काही वेळा बाजारात पालाश खत उपलब्ध होत नाही. ते नसेल तर ज्यामध्ये तीनही घटक (नत्र, स्फुरद, पालाश) आहेत अशी मिश्र खतांचा वापर तीन हप्त्यात करावा.
- खत देताना नारळ मुळांचा विचार करण्याची गरज आहे. मोठ्या नारळाची ८५ टक्के अन्न शोषून घेणारी मुळे ही खोडापासून आडवी १.८ मीटर आणि ९० ते १२० सें.मी. खोलीपर्यंत वाढतात.लागवडीपासून विचार केला तर ही मुळे दरवर्षी ३० सें.मी. वाढून ५ व्या वर्षी १.८० मीटरपर्यंत पसरतात.
- मुळे झाडाच्या बुंध्यापासून गोलाकार पसरलेली असतात. त्यामुळे त्याला गोलाकार आळे तयार करून खते द्यावीत. यासाठी मोठ्या नारळ झाडास आळे करताना बुंध्यापासून ४५ सें.मी. त्रिज्येचे गोलाकार अंतर सोडावे आणि पुढील १ ते १.३५ मीटर जागेत गोलाकार बशीसारखे आळे तयार करावे. त्यासाठी नारळ झाडाकडे तोंड करून उभे रहावे आणि माती फावड्याने आपल्याकडे ओढावी. आळ्याची मधील खोली ८ सें.मी. तर कडेने ६ सें.मी. असावी. यावेळी नारळ झाडाची मुळे तुटली तरी हरकत नाही, कारण ही तंतूमय मुळे असल्याने त्यावर विपरीत परिणाम होत नाही.
- आळे पद्धतीने खते जून महिन्यात द्यावीत. यावेळी वर शिफारस केलेली खते त्याचप्रमाणे बागेतील काडीकचरा आळ्यात टाकावा. त्यावर माती ओढावी. त्यामुळे पालापाचोळा आणि शेणखत चांगले कुजेल.
- ऑक्टोबरमध्ये पाण्यासाठी आळे करावे लागेल. त्यासाठी आळ्यातील चांगली माती बांधासाठी न वापरता आळ्याच्या बाहेरील माती घेऊन आळ्याचा बांध करावा.
- ऑक्टोबर / फेब्रुवारीचा खताचा हप्ता आळ्यात सभोवताली पसरून टाकावा आणि टिकाव किंवा विळ्याच्या साहाय्याने मातीत मिसळून त्यात पाणी द्यावे.
- ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असेल तर ज्याठिकाणी ठिबकचे पाणी पडते तेथे ऑक्टोबर / फेब्रुवारीतील खते द्यावी आणि मातीत मिसळावीत.
सेंद्रिय पद्धतीने खत नियोजन
- नारळ बागेतील झावळ्या आणि इतर काडीकचरा, गवत यांचा उपयोग करून गांडूळखत तयार करावे. त्याचा वापर करावा. नारळ झावळ्यांपासून २२ ते २५ किलो गांडूळखत तयार करता येते.
- मोठ्या झाडाच्या आळ्यात वळिवाचा पाऊस सुरू होताच मे महिन्याचे शेवटी धैंचा अगर ताग पेरावा आणि तो आळ्यात गाडावा. यामधून १५ ते २० किलो हिरवळीचे खत मिळू शकते.
- बागेच्या कुंपणाचे कडेला गिरिपुष्पाची लागवड करून त्याचाही वापर करावा.
पाणी व्यवस्थापन
- नारळ हे बागायती पीक आहे. पाण्याची गरज ही जमिनीचा मगदूर आणि झाडाचे वय यावर अवलंबून असते. कोकणात पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते मे या कालावधीत नारळाला पाण्याची गरज असते.
- आळे पद्धतीने पाणी देताना हिवाळ्यात १६० ते १८० लिटर आणि उन्हाळ्यात २०० ते २४० लिटर पाणी चार दिवसांच्या अंतराने देणे गरजेचे आहे. परंतु लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी हिवाळ्यात ३० ते ३५ लिटर आणि उन्हाळ्यात ४० ते ४५ लिटर पाणी आळे पद्धतीने चार दिवसांनी द्यावे. हेच प्रमाण दरवर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षी आणि पुढे वरील प्रमाणे हिवाळ्यात १६० ते १८० लिटर आणि उन्हाळ्यात २०० ते २४० लिटर पाणी चार दिवसांच्या अंतराने द्यावे.
- सुरुवातीपासून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असेल तर पहिल्या वर्षी हिवाळ्यात ६ ते ७ लिटर तर उन्हाळ्यात ८ ते १० लिटर पाणी दररोज द्यावे. ते दरवर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षी हिवाळ्यात ३० ते ३५ लिटर आणि उन्हाळ्यात ४० ते ४५ लिटर पाणी दररोज द्यावे.
नारळ बागेत जलसंधारण
- वर्षातून दोन वेळा पावसाच्या सुरुवातीस आणि अखेरीस बागेची नांगरट करावी.
- प्रत्येक नारळाच्या आळ्यात उपलब्धतेनुसार सोडणाचा भुसा, हिरवा पाला, वाळलेला पालापाचोळा, गवत, नारळ झावळ्यांचे तुकडे यांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
- शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत, हिरवा पाला यांचा वापर करावा.
- नारळ बागेत नारळ झाडाच्या आळ्यात अगर चर खोदून सोडणे गाडावीत.
- शिफारशीनुसार पालाश खतांचा वापर करावा.
उंच, ठेंगू आणि संकरित जातींसाठी खतमात्रा
वय वर्ष | कंपोस्ट/ शेणखत (किलो) | नत्र (ग्रॅम) | स्फुरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) | सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रॅम) | संकरित जातींसाठी पालाश (ग्रॅम) |
१ | १० | २०० | १०० | २०० | १०० | ४०० |
२ | २० | ४०० | २०० | ४०० | २०० | ८०० |
३ | ३० | ६०० | ३०० | ६०० | ३०० | १२०० |
४ | ४० | ८०० | ४०० | ८०० | ४०० | १६०० |
५ | ५० | १००० | ५०० | १००० | ५०० | २००० |
(टीप- संकरित जातींसाठी फक्त पालाश खतांची मात्रा दुप्पट करावी.)
संपर्क- डॉ.दिलीप नागवेकर, ९४२११३७७६९
(माजी कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी)
नारळ हे बागायती पीक आहे. पाण्याची गरज ही जमिनीचा मगदूर आणि झाडाचे वय यावर अवलंबून असते. माती परीक्षण आणि झाडाचे वय लक्षात घेऊन शिफारशीत खतमात्रा दिल्यास नारळाची गळ होत नाही.
नारळाची लागवड ही ५ ते १० गुंठे ते एकर बागेच्या स्वरूपात, घराशेजारी १ ते ५ झाडे आणि काही ठिकाणी कुंपणाच्याकडेने, रस्त्याचे बाजूने केली जात आहे. नारळाचे झाड लागवड केल्यानंतर ६० ते ८० वर्षे जगून चांगल्या प्रकारे उत्पादन देते. परंतु यापासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सातत्याने योग्यप्रकारे मशागत करणे गरजेचे आहे. या मशागतीत खत आणि पाणी यांचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे.
नारळ फळगळीवर उपाय
- नारळ जाती आणि नारळ झाडाचे शरीरविज्ञानशास्त्र लक्षात घेणे गरजेचे आहे. जातीनुसार नारळाला फळधारणा ४ ते ७ वर्षांत सुरू होते. त्यानंतर मात्र नारळ झाडाला दर महिन्याला एक पान आणि एक फुलोरा (पोय) येत असते. यामध्ये हवामानाच्या विविध घटकांचा परिणाम होत असतो त्यामुळे या दिवसामध्ये देखील फरक पडत असतो.
- फुलोऱ्याला फळ लागणे हे सर्वस्वी आपल्या मशागतीवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे जातीनुसार फळधारणा सुरू झाल्यावर पहिल्या ६ ते ७ फुलोऱ्यांना (पोय) अनेक वेळा अजिबात फळे लागत नाही तर काही वेळा एखादं दुसरे फळ लागते. त्याचप्रमाणे फुलाचा तुरा बाहेर पडल्यापासून पहिल्या दोन महिन्यात गळीचे प्रमाण जास्त असते. फळधारणा झाल्यापासून दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यामध्ये गळीचे प्रमाण उच्चांक गाठते. कमी जास्त प्रमाणात वर्षभर फळगळ होत असते.
- फुलोऱ्याचा गर्भधारणा कालावधी हा ३२ ते ३६ महिन्यांचा असतो. त्यामुळे या कालावधीत त्याच्यावर होणारे निसर्गातील, वातावरणातील बदल महत्त्वाचे ठरतात. त्याचप्रमाणे याच कालावधीत अन्न आणि पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. यासाठी लागत्या नारळ झाडांना जाती आणि शिफारशीनुसार खते द्यावीत.
- खते तीन हप्त्यामध्ये (जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी) विभागून द्यावीत. त्यासाठी शिफारशीत खतांपैकी १/३ नत्र आणि पालाश तर स्फुरद आणि कंपोस्ट / शेणखत संपूर्णपणे जून महिन्यात एकाच वेळी द्यावे.
- शिल्लक २/३ नत्र आणि पालाश खतांची मात्रा समान हप्त्यात विभागून ऑक्टोबर आणि फेब्रुवारी मध्ये द्यावी.
- एरिओफाईड माईटस् या किडीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १० किलो निंबोळी पेंड दोन समान हप्त्यामध्ये विभागून द्यावी.
- नारळ पिकात नत्र आणि पालाश अन्नद्रव्यांची गरज अनन्य साधारण आहे. काही वेळा बाजारात पालाश खत उपलब्ध होत नाही. ते नसेल तर ज्यामध्ये तीनही घटक (नत्र, स्फुरद, पालाश) आहेत अशी मिश्र खतांचा वापर तीन हप्त्यात करावा.
- खत देताना नारळ मुळांचा विचार करण्याची गरज आहे. मोठ्या नारळाची ८५ टक्के अन्न शोषून घेणारी मुळे ही खोडापासून आडवी १.८ मीटर आणि ९० ते १२० सें.मी. खोलीपर्यंत वाढतात.लागवडीपासून विचार केला तर ही मुळे दरवर्षी ३० सें.मी. वाढून ५ व्या वर्षी १.८० मीटरपर्यंत पसरतात.
- मुळे झाडाच्या बुंध्यापासून गोलाकार पसरलेली असतात. त्यामुळे त्याला गोलाकार आळे तयार करून खते द्यावीत. यासाठी मोठ्या नारळ झाडास आळे करताना बुंध्यापासून ४५ सें.मी. त्रिज्येचे गोलाकार अंतर सोडावे आणि पुढील १ ते १.३५ मीटर जागेत गोलाकार बशीसारखे आळे तयार करावे. त्यासाठी नारळ झाडाकडे तोंड करून उभे रहावे आणि माती फावड्याने आपल्याकडे ओढावी. आळ्याची मधील खोली ८ सें.मी. तर कडेने ६ सें.मी. असावी. यावेळी नारळ झाडाची मुळे तुटली तरी हरकत नाही, कारण ही तंतूमय मुळे असल्याने त्यावर विपरीत परिणाम होत नाही.
- आळे पद्धतीने खते जून महिन्यात द्यावीत. यावेळी वर शिफारस केलेली खते त्याचप्रमाणे बागेतील काडीकचरा आळ्यात टाकावा. त्यावर माती ओढावी. त्यामुळे पालापाचोळा आणि शेणखत चांगले कुजेल.
- ऑक्टोबरमध्ये पाण्यासाठी आळे करावे लागेल. त्यासाठी आळ्यातील चांगली माती बांधासाठी न वापरता आळ्याच्या बाहेरील माती घेऊन आळ्याचा बांध करावा.
- ऑक्टोबर / फेब्रुवारीचा खताचा हप्ता आळ्यात सभोवताली पसरून टाकावा आणि टिकाव किंवा विळ्याच्या साहाय्याने मातीत मिसळून त्यात पाणी द्यावे.
- ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असेल तर ज्याठिकाणी ठिबकचे पाणी पडते तेथे ऑक्टोबर / फेब्रुवारीतील खते द्यावी आणि मातीत मिसळावीत.
सेंद्रिय पद्धतीने खत नियोजन
- नारळ बागेतील झावळ्या आणि इतर काडीकचरा, गवत यांचा उपयोग करून गांडूळखत तयार करावे. त्याचा वापर करावा. नारळ झावळ्यांपासून २२ ते २५ किलो गांडूळखत तयार करता येते.
- मोठ्या झाडाच्या आळ्यात वळिवाचा पाऊस सुरू होताच मे महिन्याचे शेवटी धैंचा अगर ताग पेरावा आणि तो आळ्यात गाडावा. यामधून १५ ते २० किलो हिरवळीचे खत मिळू शकते.
- बागेच्या कुंपणाचे कडेला गिरिपुष्पाची लागवड करून त्याचाही वापर करावा.
पाणी व्यवस्थापन
- नारळ हे बागायती पीक आहे. पाण्याची गरज ही जमिनीचा मगदूर आणि झाडाचे वय यावर अवलंबून असते. कोकणात पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते मे या कालावधीत नारळाला पाण्याची गरज असते.
- आळे पद्धतीने पाणी देताना हिवाळ्यात १६० ते १८० लिटर आणि उन्हाळ्यात २०० ते २४० लिटर पाणी चार दिवसांच्या अंतराने देणे गरजेचे आहे. परंतु लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी हिवाळ्यात ३० ते ३५ लिटर आणि उन्हाळ्यात ४० ते ४५ लिटर पाणी आळे पद्धतीने चार दिवसांनी द्यावे. हेच प्रमाण दरवर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षी आणि पुढे वरील प्रमाणे हिवाळ्यात १६० ते १८० लिटर आणि उन्हाळ्यात २०० ते २४० लिटर पाणी चार दिवसांच्या अंतराने द्यावे.
- सुरुवातीपासून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असेल तर पहिल्या वर्षी हिवाळ्यात ६ ते ७ लिटर तर उन्हाळ्यात ८ ते १० लिटर पाणी दररोज द्यावे. ते दरवर्षी वाढवत जाऊन पाचव्या वर्षी हिवाळ्यात ३० ते ३५ लिटर आणि उन्हाळ्यात ४० ते ४५ लिटर पाणी दररोज द्यावे.
नारळ बागेत जलसंधारण
- वर्षातून दोन वेळा पावसाच्या सुरुवातीस आणि अखेरीस बागेची नांगरट करावी.
- प्रत्येक नारळाच्या आळ्यात उपलब्धतेनुसार सोडणाचा भुसा, हिरवा पाला, वाळलेला पालापाचोळा, गवत, नारळ झावळ्यांचे तुकडे यांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
- शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत, हिरवा पाला यांचा वापर करावा.
- नारळ बागेत नारळ झाडाच्या आळ्यात अगर चर खोदून सोडणे गाडावीत.
- शिफारशीनुसार पालाश खतांचा वापर करावा.
उंच, ठेंगू आणि संकरित जातींसाठी खतमात्रा
वय वर्ष | कंपोस्ट/ शेणखत (किलो) | नत्र (ग्रॅम) | स्फुरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) | सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रॅम) | संकरित जातींसाठी पालाश (ग्रॅम) |
१ | १० | २०० | १०० | २०० | १०० | ४०० |
२ | २० | ४०० | २०० | ४०० | २०० | ८०० |
३ | ३० | ६०० | ३०० | ६०० | ३०० | १२०० |
४ | ४० | ८०० | ४०० | ८०० | ४०० | १६०० |
५ | ५० | १००० | ५०० | १००० | ५०० | २००० |
(टीप- संकरित जातींसाठी फक्त पालाश खतांची मात्रा दुप्पट करावी.)
संपर्क- डॉ.दिलीप नागवेकर, ९४२११३७७६९
(माजी कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी)
[ad_2]
Source link