[ad_1]
नाशिक : देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु झाली. या रेल्वेमुळे शेतीमाल थेट परराज्यात विक्रीची जलद सुविधा सुरु झाली. त्यामुळे मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोनवेळा रेल्वे सुरु करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे.
रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार यापुढे ही रेल्वे आठवड्यातून दोनदा देवळाली रेल्वे स्थानकातून धावेल.
किसान रेल्वे सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत एकूण ३ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे ७८ , ९९ व १५१ टन असा एकूण ३२८ टन शेतमाल व कृषी पूरक साहित्य पाठवण्यात आले आहे. देवळाली कॅम्प येथून संध्याकाळी ६ वाजता निघेल. नाशिक रोड येथे संध्या. ६.१०, मनमाड येथे ७.३०, जळगाव येथे ९.५५ व भुसावळ येथे रात्री १०.४५ वाजता व दानापूरला गुरुवारी व रविवारी दुपारी २ वाजता पोहचेल.
किसान रेल्वेद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्याच्या कृषि उत्पादनांना बाजारपेठ मिळून फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. पार्सल एक्सप्रेसमुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
– चंद्रशेखर बारी, उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन मंडळ नाशिक विभाग.
नाशिक : देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु झाली. या रेल्वेमुळे शेतीमाल थेट परराज्यात विक्रीची जलद सुविधा सुरु झाली. त्यामुळे मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोनवेळा रेल्वे सुरु करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे.
रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार यापुढे ही रेल्वे आठवड्यातून दोनदा देवळाली रेल्वे स्थानकातून धावेल.
किसान रेल्वे सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत एकूण ३ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे ७८ , ९९ व १५१ टन असा एकूण ३२८ टन शेतमाल व कृषी पूरक साहित्य पाठवण्यात आले आहे. देवळाली कॅम्प येथून संध्याकाळी ६ वाजता निघेल. नाशिक रोड येथे संध्या. ६.१०, मनमाड येथे ७.३०, जळगाव येथे ९.५५ व भुसावळ येथे रात्री १०.४५ वाजता व दानापूरला गुरुवारी व रविवारी दुपारी २ वाजता पोहचेल.
किसान रेल्वेद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्याच्या कृषि उत्पादनांना बाजारपेठ मिळून फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. पार्सल एक्सप्रेसमुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
– चंद्रशेखर बारी, उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन मंडळ नाशिक विभाग.
[ad_2]
Source link