[ad_1]
नाशिक : शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शेतरस्त्यांच्या कामांच्या आराखड्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
आराखड्यांना मंजुरी मिळालेल्या ग्रामपंचायती बागलाण, इगतपुरी, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील आहेत. शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी सारखी इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येत असल्यामुळे शेतीमाल बाजारात पोहोचविण्याकरिता यंत्रसामग्री शेतीपर्यंत, जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. परंतु शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने राज्यात शेतरस्ताचा विकास दुर्लक्षित होता. त्यामुळे ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेले शेत, पाणंद रस्ते विकसित करण्याचा दृष्टीने शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील शेतरस्ते यांचा आराखडे तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या आराखडे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार या सर्व आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यातील बागलाण, इगतपुरी, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यांतील ग्रामपंचायतीअंतर्गत ६९ शेतरस्त्यांच्या आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अर्धा किलोमीटर ते दोन किलोमीटरच्या रस्ते तयार करणे, त्याचे खडीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत.
नाशिक : शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शेतरस्त्यांच्या कामांच्या आराखड्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
आराखड्यांना मंजुरी मिळालेल्या ग्रामपंचायती बागलाण, इगतपुरी, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील आहेत. शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी सारखी इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येत असल्यामुळे शेतीमाल बाजारात पोहोचविण्याकरिता यंत्रसामग्री शेतीपर्यंत, जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. परंतु शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने राज्यात शेतरस्ताचा विकास दुर्लक्षित होता. त्यामुळे ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेले शेत, पाणंद रस्ते विकसित करण्याचा दृष्टीने शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील शेतरस्ते यांचा आराखडे तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या आराखडे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार या सर्व आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यातील बागलाण, इगतपुरी, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यांतील ग्रामपंचायतीअंतर्गत ६९ शेतरस्त्यांच्या आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अर्धा किलोमीटर ते दोन किलोमीटरच्या रस्ते तयार करणे, त्याचे खडीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.