[ad_1]
नाशिक : मागील वर्षी नैसर्गिक संकटांचा सामना केल्यानंतर यंदाही नुकसानीचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. आता ढगाळ वातावरण, पावसाची रिमझिम होऊन तयार झालेल्या गारव्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर हवेत गारवा वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ज्या बागा काही अंशी फुलोरा अवस्थेत आहेत, त्यामध्ये गळकुज होण्याची भीती आहे. सटाणा, मालेगाव व कळवण तालुक्यातील अनेक भागांत द्राक्ष माल काढणीला आला आहे. या भागात पाऊस झाल्यास तडे जाण्याचे प्रमाण वाढून बागांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
नुकसान रोखण्यासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे. काही बागा नियमित द्राक्ष हंगामात घड पाणी उतरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे वातावरण बदलांमुळे वाणांना तडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारपर्यंत वातावरण निवळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंचन व्यवस्थापन जास्तीचे दिल्यास ढगाळ वातावरणात नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन केल्यास नत्र स्थिर राहून तडे जाण्याची समस्या कमी होईल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागेच्या अवस्थेनुसार शिफारशीनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बुरशी नाशकांची फवारणी करावी. कांदा पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी योग्य ती उपाययोजना करावी.
– डॉ. राकेश सोनवणे, वनपस्ती रोग शास्त्रज्ञ, द्राक्ष व कांदा संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत.
या आहेत अडचणी
- उत्पादन खर्चवाढीची शक्यता
- पूर्वहंगामी बागांमध्ये तडे जाण्याची भीती
- रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
नाशिक : मागील वर्षी नैसर्गिक संकटांचा सामना केल्यानंतर यंदाही नुकसानीचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. आता ढगाळ वातावरण, पावसाची रिमझिम होऊन तयार झालेल्या गारव्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर हवेत गारवा वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ज्या बागा काही अंशी फुलोरा अवस्थेत आहेत, त्यामध्ये गळकुज होण्याची भीती आहे. सटाणा, मालेगाव व कळवण तालुक्यातील अनेक भागांत द्राक्ष माल काढणीला आला आहे. या भागात पाऊस झाल्यास तडे जाण्याचे प्रमाण वाढून बागांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.
नुकसान रोखण्यासाठी फवारणीचा खर्च वाढला आहे. काही बागा नियमित द्राक्ष हंगामात घड पाणी उतरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे वातावरण बदलांमुळे वाणांना तडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारपर्यंत वातावरण निवळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंचन व्यवस्थापन जास्तीचे दिल्यास ढगाळ वातावरणात नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन केल्यास नत्र स्थिर राहून तडे जाण्याची समस्या कमी होईल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागेच्या अवस्थेनुसार शिफारशीनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बुरशी नाशकांची फवारणी करावी. कांदा पिकांवर करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी योग्य ती उपाययोजना करावी.
– डॉ. राकेश सोनवणे, वनपस्ती रोग शास्त्रज्ञ, द्राक्ष व कांदा संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत.
या आहेत अडचणी
- उत्पादन खर्चवाढीची शक्यता
- पूर्वहंगामी बागांमध्ये तडे जाण्याची भीती
- रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
[ad_2]
Source link