[ad_1]
नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३ दिवसाच्यांवर लिलाव प्रक्रिया बंद ठेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. मात्र बाजार समिती शेतकरी वर्गाला विचारात न घेता मनमानी निर्णय घेऊ शेकते? त्यामुळे जिल्ह्यातील कांदा लिलाव तातडीने सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात लासलगाव बाजार समिती गेल्या सप्ताहापासून बंद आहे. तर नामपूर बाजार समितीने बाहेर गावाहून वाहने व शेतकरी नामपूर गावात येत असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. असे सांगून २६ व २७ एप्रिल रोजी बाजार समितीत कांदा व डाळिंब लिलाव बंद राहतील, अशी सूचना दिली आहे. शनिवार (ता.२४) पासून पुढील सलग ४ दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा घाट घातला गेला आहे.
शेतकरी सध्या कांदा काढणी व इतर बाबींचा विचार करता मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा विक्रीनंतर मजुरी, चाळ बांधणी, वाहन भाडे, लवकरच खरीप पिकांचे पुढील व्यवस्थापन करण्यासाठी पैशाची गरज आहे. मागील संपूर्ण महिन्याचा विचार करता बाजार समितीत २४ दिवसांपैकी फक्त १० ते १२ दिवस कामकाज चालले आहे. या सुट्यांनंतर बाजार समिती चालू होताच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. परिणामी बाजार भाव पडतात, असे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र तो कांदा लिलावामुळे कोरोना वाढत आहे अशी सबब देणे पूर्ण पणे चुकीचे आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून आजपासून (ता.२६) ताबडतोब कांदा लिलाव पूर्ववत करा, अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे म्हटले आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी अधिकार वापरावे
जिल्ह्यातील बऱ्याच बाजार समित्या मजूर टंचाई, आर्थिक टंचाई, अशी सबब देऊन काही घटकांच्या अर्जावर मार्केट २ ते ३ दिवस, तर काही ठिकाणी ५ दिवस बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवले जातात. शेतकरी वर्गावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी बाजार समित्यांनी घ्यावी, असे निर्देश अधिकार वापरून करावा, या आशयाचे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष अभिमान पगार यांनी दिले.
नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३ दिवसाच्यांवर लिलाव प्रक्रिया बंद ठेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. मात्र बाजार समिती शेतकरी वर्गाला विचारात न घेता मनमानी निर्णय घेऊ शेकते? त्यामुळे जिल्ह्यातील कांदा लिलाव तातडीने सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात लासलगाव बाजार समिती गेल्या सप्ताहापासून बंद आहे. तर नामपूर बाजार समितीने बाहेर गावाहून वाहने व शेतकरी नामपूर गावात येत असल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. असे सांगून २६ व २७ एप्रिल रोजी बाजार समितीत कांदा व डाळिंब लिलाव बंद राहतील, अशी सूचना दिली आहे. शनिवार (ता.२४) पासून पुढील सलग ४ दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा घाट घातला गेला आहे.
शेतकरी सध्या कांदा काढणी व इतर बाबींचा विचार करता मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा विक्रीनंतर मजुरी, चाळ बांधणी, वाहन भाडे, लवकरच खरीप पिकांचे पुढील व्यवस्थापन करण्यासाठी पैशाची गरज आहे. मागील संपूर्ण महिन्याचा विचार करता बाजार समितीत २४ दिवसांपैकी फक्त १० ते १२ दिवस कामकाज चालले आहे. या सुट्यांनंतर बाजार समिती चालू होताच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. परिणामी बाजार भाव पडतात, असे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र तो कांदा लिलावामुळे कोरोना वाढत आहे अशी सबब देणे पूर्ण पणे चुकीचे आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून आजपासून (ता.२६) ताबडतोब कांदा लिलाव पूर्ववत करा, अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे म्हटले आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी अधिकार वापरावे
जिल्ह्यातील बऱ्याच बाजार समित्या मजूर टंचाई, आर्थिक टंचाई, अशी सबब देऊन काही घटकांच्या अर्जावर मार्केट २ ते ३ दिवस, तर काही ठिकाणी ५ दिवस बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवले जातात. शेतकरी वर्गावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी बाजार समित्यांनी घ्यावी, असे निर्देश अधिकार वापरून करावा, या आशयाचे निवेदन जिल्हा उपाध्यक्ष अभिमान पगार यांनी दिले.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.