[ad_1]
रत्नागिरी। महाराष्ट्र वासियांच्या उरात धडकी भरवणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीची कोकण किनारपट्टीची निसर्गाने दाणादाण उडवली असून ताशी १०० किमीच्या आसपास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी अनेकांची घरे उध्दवस्त केली आहेत. तर कोसळलेल्या वृक्षांमुळे अनेकांच्या घरांचे अतोनात नुकसान झालय.
रत्नागिरीचा समुद्र खवळला असून वादळात एक जहाज भरकले आहे. पहाटेपासूनच वादळाची तिव्रता जाणवायला सुरवात झाली होती. त्यामुळे झाडांमधून सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज ऐकायला मिळत होता. आता वादळ धडकल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली असून अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. महावितरणने काल रात्रीपासून अनुचित प्रकार टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडीत केला आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सर्तक असून दापोली, गुहागर, मंडणगड तालुक्यातील किनारी भागात सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या तिन्ही ठिकाणावरून सुमारे चार हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. चक्रीवादळाचा परिणाम रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
[ad_2]
Source link