[ad_1]
परळी : राज्य कापूस पणन महासंघाच्या परळी विभागात ८ केंद्रांवरून जवळपास ४ लाख ७० हजार क्विंटल कापसाची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. ३ डिसेंबरपासून पणन विभागामार्फत हमीदराने खरेदी सुरू करण्यात आली आहे.
राज्य कापूस पणन महासंघाच्या परळी विभागात सुरुवातील जवळपास ३ केंद्रांत कापसाची हमीदराने खरेदी सुरू करण्यात आली होती. आता ही केंद्रांची संख्या ८ वर पोहोचली आहे. यामध्ये माजलगाव, धारूर, केज, परळी, आष्टी व बीड या बीड जिल्ह्यातील, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब व लातूर जिल्ह्यातील रेणापूर या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या कापसावर जवळपास २५ जिनिंगच्या माध्यमातून प्रक्रिया केली जात आहे. ‘सीसीआय’च्या अधिनस्त कापूस पणन महासंघ कापसाची खरेदी करते आहे.
यंदाच्या हंगामात ३० सप्टेबरपर्यंत कापसाची खरेदी सुरू राहणार असल्याचे ‘सीसीआय’ने आधीच स्पष्ट केले आहे. कापूस ‘पणन’च्या सूत्रांनुसार त्यांच्या खरेदी केंद्रावर येणाऱ्या कापसाच्या वाहनांची संख्या पाहता आवकेची गती आणखी किमान दीड ते दोन महिन्यापर्यंत कायम राहील. आजघडीला परळी विभागातील सर्व केंद्रांवर मिळून जवळपास ४० ते ५० हजार क्विंटल कापसाची आवक होते आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
साठवणुकीचा प्रश्न
कापूस साठवणुकीचा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. गतवर्षी खरेदी केलेला शेतीमाल आधीच विविध गोदामांमध्ये साठवून ठेवलेला असल्याने कापसाच्या गाठी साठविण्यासाठी गोदामांची अडचणी यंत्रणेला येते आहे. त्यावर पर्याय शोधण्यासाठी गोदामांची शोधाशोध यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कापूस खरेदीची गती चांगली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच कापूस खरेदी होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.
परळी : राज्य कापूस पणन महासंघाच्या परळी विभागात ८ केंद्रांवरून जवळपास ४ लाख ७० हजार क्विंटल कापसाची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. ३ डिसेंबरपासून पणन विभागामार्फत हमीदराने खरेदी सुरू करण्यात आली आहे.
राज्य कापूस पणन महासंघाच्या परळी विभागात सुरुवातील जवळपास ३ केंद्रांत कापसाची हमीदराने खरेदी सुरू करण्यात आली होती. आता ही केंद्रांची संख्या ८ वर पोहोचली आहे. यामध्ये माजलगाव, धारूर, केज, परळी, आष्टी व बीड या बीड जिल्ह्यातील, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब व लातूर जिल्ह्यातील रेणापूर या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या कापसावर जवळपास २५ जिनिंगच्या माध्यमातून प्रक्रिया केली जात आहे. ‘सीसीआय’च्या अधिनस्त कापूस पणन महासंघ कापसाची खरेदी करते आहे.
यंदाच्या हंगामात ३० सप्टेबरपर्यंत कापसाची खरेदी सुरू राहणार असल्याचे ‘सीसीआय’ने आधीच स्पष्ट केले आहे. कापूस ‘पणन’च्या सूत्रांनुसार त्यांच्या खरेदी केंद्रावर येणाऱ्या कापसाच्या वाहनांची संख्या पाहता आवकेची गती आणखी किमान दीड ते दोन महिन्यापर्यंत कायम राहील. आजघडीला परळी विभागातील सर्व केंद्रांवर मिळून जवळपास ४० ते ५० हजार क्विंटल कापसाची आवक होते आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
साठवणुकीचा प्रश्न
कापूस साठवणुकीचा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. गतवर्षी खरेदी केलेला शेतीमाल आधीच विविध गोदामांमध्ये साठवून ठेवलेला असल्याने कापसाच्या गाठी साठविण्यासाठी गोदामांची अडचणी यंत्रणेला येते आहे. त्यावर पर्याय शोधण्यासाठी गोदामांची शोधाशोध यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कापूस खरेदीची गती चांगली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच कापूस खरेदी होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.
[ad_2]
Source link