[ad_1]
पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे जवळपास १४ ते १५ दिवस मॉन्सून रेंगाळला होता. मात्र, आता राज्याचा पश्चिम भाग, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातूनही मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
गेल्या महिन्यात २८ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या वायव्य भागातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासास सुरुवात झाली होती. त्यानंतर वेगाने उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचलप्रदेश या भागातून माघार घेत ६ आॅक्टोबरपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश आणि अरबी समुद्रातील अनेक भागातून माघार घेतली होती. गेल्या काही दिवस राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक स्थिती बनणार आहे. चालू वर्षी हवामान विभागाने नवीन अंदानानुसार पाच आॅक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात ९ आॅक्टोबर रोजी तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले पंधरा दिवस माॅन्सून रेंगाळला आहे.
सध्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होत असून हवा कोरडी होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस न पडल्यास अरबी समुद्र आणि राज्याच्या उत्तर भागातून माघार घेण्याची शक्यता आहे. तर चार ते पाच दिवसांत विदर्भाच्या अनेक भागातून माघार घेणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे जवळपास १४ ते १५ दिवस मॉन्सून रेंगाळला होता. मात्र, आता राज्याचा पश्चिम भाग, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातूनही मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
गेल्या महिन्यात २८ सप्टेंबर रोजी राजस्थानच्या वायव्य भागातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासास सुरुवात झाली होती. त्यानंतर वेगाने उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचलप्रदेश या भागातून माघार घेत ६ आॅक्टोबरपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश आणि अरबी समुद्रातील अनेक भागातून माघार घेतली होती. गेल्या काही दिवस राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सूनला माघार घेण्यासाठी पोषक स्थिती बनणार आहे. चालू वर्षी हवामान विभागाने नवीन अंदानानुसार पाच आॅक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात ९ आॅक्टोबर रोजी तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले पंधरा दिवस माॅन्सून रेंगाळला आहे.
सध्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होत असून हवा कोरडी होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस न पडल्यास अरबी समुद्र आणि राज्याच्या उत्तर भागातून माघार घेण्याची शक्यता आहे. तर चार ते पाच दिवसांत विदर्भाच्या अनेक भागातून माघार घेणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
[ad_2]
Source link