[ad_1]
परभणी : यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांची आत्महत्या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या आहे. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यावे, या मागणीसाठी शनिवारी (ता.१९) कोक (ता. जिंतूर) येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे रामेश्वर बारवकर, बबन मगर, शेख सलीम, गजानन वाणी यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत वैयक्तिक उपवास करत अनेक जण अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले. या वेळी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला गेला.
मूर्तिजापुरात विविध संघटनांचे अन्नत्याग
अकोला ः जगातील अन्नदात्या शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी व शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात किसानपुत्र आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (ता.१९) केले.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग)कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आदी शेती व्यवसायाला कंगाल करणाऱ्या कायद्यांचा विरोध करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, छप्री हाऊस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, न्यू यंग क्लब, भारतीय किसान संघ व अन्य शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले.
परभणी : यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांची आत्महत्या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या आहे. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यावे, या मागणीसाठी शनिवारी (ता.१९) कोक (ता. जिंतूर) येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे रामेश्वर बारवकर, बबन मगर, शेख सलीम, गजानन वाणी यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत वैयक्तिक उपवास करत अनेक जण अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले. या वेळी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला गेला.
मूर्तिजापुरात विविध संघटनांचे अन्नत्याग
अकोला ः जगातील अन्नदात्या शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी व शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात किसानपुत्र आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (ता.१९) केले.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग)कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आदी शेती व्यवसायाला कंगाल करणाऱ्या कायद्यांचा विरोध करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, छप्री हाऊस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, न्यू यंग क्लब, भारतीय किसान संघ व अन्य शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले.
[ad_2]
Source link