[ad_1]
नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील पाझर तलावाकडे पाहणी केली नाही. दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचाच अडचणी वाढल्याने पाटबंधारे विभागावरच गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जायखेडा पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा रयत क्रांती संघटनेने निवेदनाद्वारे दिला. याबाबत संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्याकडे निवेदन दिले.
गेल्या २५ वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे तळवाडे भामेर येथील पाझर तलावाकडे दुर्लक्ष आहे. तलावाच्या दरवाजांची दुरुस्तीही केलेली नाही. नादुरुस्त मोऱ्या व माती बांधावर मोठमोठी झाडे वाढले आहेत. सध्या तळवाडे भामेर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असताना तलावातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. शेतकऱ्यांची शेती, विहीर आणि शेतातल्या जनावरांच्या जीविताला मोठा धोका आहे. त्यामुळे या नाल्यात पाणी सोडू नये, अशी विनंती शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली.
संघटनेचे जिल्हा सरचिटणीस डोंगर पगार, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, तालुकाध्यक्ष युवराज देवरे, भाऊसाहेब पगार, भिका धोंडगे, हिंमत धोंडगे, संदीप कापडणीस आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप
शेतकऱ्यांची विनंती व भावना लक्षात न घेता पाटबंधारे विभागाने स्वतःची चुक झाकण्यासाठी त्यांच्यावरच पोलिसांकडून गुन्हे दाखल केले. त्यांना अटक झाली. हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील पाझर तलावाकडे पाहणी केली नाही. दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचाच अडचणी वाढल्याने पाटबंधारे विभागावरच गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जायखेडा पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा रयत क्रांती संघटनेने निवेदनाद्वारे दिला. याबाबत संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्याकडे निवेदन दिले.
गेल्या २५ वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे तळवाडे भामेर येथील पाझर तलावाकडे दुर्लक्ष आहे. तलावाच्या दरवाजांची दुरुस्तीही केलेली नाही. नादुरुस्त मोऱ्या व माती बांधावर मोठमोठी झाडे वाढले आहेत. सध्या तळवाडे भामेर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असताना तलावातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. शेतकऱ्यांची शेती, विहीर आणि शेतातल्या जनावरांच्या जीविताला मोठा धोका आहे. त्यामुळे या नाल्यात पाणी सोडू नये, अशी विनंती शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली.
संघटनेचे जिल्हा सरचिटणीस डोंगर पगार, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, तालुकाध्यक्ष युवराज देवरे, भाऊसाहेब पगार, भिका धोंडगे, हिंमत धोंडगे, संदीप कापडणीस आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप
शेतकऱ्यांची विनंती व भावना लक्षात न घेता पाटबंधारे विभागाने स्वतःची चुक झाकण्यासाठी त्यांच्यावरच पोलिसांकडून गुन्हे दाखल केले. त्यांना अटक झाली. हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
[ad_2]
Source link