[ad_1]
पाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूड परिसरात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
ज्वारीच्या पेरणीस परतीच्या पावसामुळे तब्बल तीन आठवडे उशीर झाला आहे. त्यामुळे बैल बारदाना (बैलजोडी ) असणाऱ्या शेतकऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे. काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असल्याचे दिसून येत आहे. परतीच्या दमदार पावसामुळे हस्त नक्षत्रामध्ये पेरणी झालेली ज्वारीचे पिके मोडून दुबार पेरणी करावी लागत आहे.
गेल्या पाच – सहा दिवसांपासून जमिनीत वाफसा आल्याने शेतकरी पेरणीची घाई करू लागले आहेत. ज्वारीच्या उत्पादनासाठी भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील भाग प्रसिद्ध आहे. मालदांडी, झुट, सफेदगंगा, बेद्रे, पाण्याचे दगडे, माळ दगडे या वाणांची पेरणी होऊ लागली आहे. सततच्या पावसामुळे वाफसा येण्यास विलंब झाला.
एक दिवसाचे बैलजोडीचे भाडे १२०० ते दीड हजार रुपये आहे. अनेक शेतकऱ्यांना बैल, बारदाना मिळत नसल्याने काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करीत आहेत.
पेरणीस उशीर झाल्यामुळे हरभरा, गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.
काही शेतकरी असे सांगतात की तुळशीच्या लग्नापर्यंत ज्वारीची पेरणी केली, तरी चांगले उत्पन्न मिळते. परतीचा पाऊस भरपूर चांगला झाल्याने पाणीसाठा वाढला आहे.
पाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूड परिसरात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
ज्वारीच्या पेरणीस परतीच्या पावसामुळे तब्बल तीन आठवडे उशीर झाला आहे. त्यामुळे बैल बारदाना (बैलजोडी ) असणाऱ्या शेतकऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे. काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असल्याचे दिसून येत आहे. परतीच्या दमदार पावसामुळे हस्त नक्षत्रामध्ये पेरणी झालेली ज्वारीचे पिके मोडून दुबार पेरणी करावी लागत आहे.
गेल्या पाच – सहा दिवसांपासून जमिनीत वाफसा आल्याने शेतकरी पेरणीची घाई करू लागले आहेत. ज्वारीच्या उत्पादनासाठी भूम तालुक्यातील पाथरूड परिसरातील भाग प्रसिद्ध आहे. मालदांडी, झुट, सफेदगंगा, बेद्रे, पाण्याचे दगडे, माळ दगडे या वाणांची पेरणी होऊ लागली आहे. सततच्या पावसामुळे वाफसा येण्यास विलंब झाला.
एक दिवसाचे बैलजोडीचे भाडे १२०० ते दीड हजार रुपये आहे. अनेक शेतकऱ्यांना बैल, बारदाना मिळत नसल्याने काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करीत आहेत.
पेरणीस उशीर झाल्यामुळे हरभरा, गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.
काही शेतकरी असे सांगतात की तुळशीच्या लग्नापर्यंत ज्वारीची पेरणी केली, तरी चांगले उत्पन्न मिळते. परतीचा पाऊस भरपूर चांगला झाल्याने पाणीसाठा वाढला आहे.
[ad_2]
Source link