[ad_1]
रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील बागेत लाल कोळी आढळून आला आहे. या कीडरोगामुळे आंब्याची पाने आणि मोहोर गळून गेला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना औषध फवारणीचा खर्च करावा लागत आहे.
गेले पंधरा दिवस सतत उन्हाचा कडाका आणि ढगाळ वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. सलग चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे जानेवारीच्या सुरवातीला तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता; मात्र त्यावर नियंत्रण आले आहे. पण नव्याने काही बागांमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा कोळी आंब्याच्या पानांमधील रस शोषून घेतो. पाने करपून जाता आणि ती गळून पडतात. ही कीड मोहोरालाही घातक बनलेली आहे.
या बाबत पावस येथील बागायतदार आनंद देसाई म्हणाले, ‘‘आमच्या बागेमध्ये काही झाडांवर लाल कोळी दिसून आला. एका झाडापासून तो तीन मीटर अंतरावर उडू शकतो. त्यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडापासून जवळ असलेल्या २५ झाडांवर औषधांची फवारणी करावी लागते. पावसमधील तीन बागांमधील काही झाडांवर हा कीटक सापडला. औषध फवारणी केली आहे. एका फवारणीसाठी दोन हजार रुपयांचे औषध लागते. तापमानातील बदलांमुळेच हा रोग उद्भवला आहे.’’
रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील बागेत लाल कोळी आढळून आला आहे. या कीडरोगामुळे आंब्याची पाने आणि मोहोर गळून गेला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना औषध फवारणीचा खर्च करावा लागत आहे.
गेले पंधरा दिवस सतत उन्हाचा कडाका आणि ढगाळ वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. सलग चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे जानेवारीच्या सुरवातीला तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता; मात्र त्यावर नियंत्रण आले आहे. पण नव्याने काही बागांमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा कोळी आंब्याच्या पानांमधील रस शोषून घेतो. पाने करपून जाता आणि ती गळून पडतात. ही कीड मोहोरालाही घातक बनलेली आहे.
या बाबत पावस येथील बागायतदार आनंद देसाई म्हणाले, ‘‘आमच्या बागेमध्ये काही झाडांवर लाल कोळी दिसून आला. एका झाडापासून तो तीन मीटर अंतरावर उडू शकतो. त्यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडापासून जवळ असलेल्या २५ झाडांवर औषधांची फवारणी करावी लागते. पावसमधील तीन बागांमधील काही झाडांवर हा कीटक सापडला. औषध फवारणी केली आहे. एका फवारणीसाठी दोन हजार रुपयांचे औषध लागते. तापमानातील बदलांमुळेच हा रोग उद्भवला आहे.’’
[ad_2]
Source link