[ad_1]
सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भात पीक क्षेत्र परिपक्व स्थितीत आहे. परंतु, पावसामुळे भात कापणी करता येत नव्हती.
१५ ते २० दिवसांनी जिल्ह्यात पावसाने पुर्णतः विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर यावर्षी भात रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे तीन हजार हेक्टरवर हळवी व भिजवणीचे भात पीक आहे. हे पीक आता परिपक्व झाले आहे. कापणीच्या स्थितीत असलेल्या या पीकाची कापणी पावसामुळे करता येत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु, आता पावसाने ‘ब्रेक’ घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे.
जिल्हयात सध्या कडक ऊन असून वातावरण असेच राहिले तर येत्या आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यातील ५० टक्के भात पीक परिपक्व होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांकडील भात पीक परिपक्व झाले आहे त्यापैकी काहींनी कापणीला सुरूवात केली आहे तर काहींनी पूर्वतयारी केली आहे.
सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात भात पीक क्षेत्र परिपक्व स्थितीत आहे. परंतु, पावसामुळे भात कापणी करता येत नव्हती.
१५ ते २० दिवसांनी जिल्ह्यात पावसाने पुर्णतः विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर यावर्षी भात रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे तीन हजार हेक्टरवर हळवी व भिजवणीचे भात पीक आहे. हे पीक आता परिपक्व झाले आहे. कापणीच्या स्थितीत असलेल्या या पीकाची कापणी पावसामुळे करता येत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु, आता पावसाने ‘ब्रेक’ घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली आहे.
जिल्हयात सध्या कडक ऊन असून वातावरण असेच राहिले तर येत्या आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यातील ५० टक्के भात पीक परिपक्व होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्यांकडील भात पीक परिपक्व झाले आहे त्यापैकी काहींनी कापणीला सुरूवात केली आहे तर काहींनी पूर्वतयारी केली आहे.
[ad_2]
Source link