[ad_1]
पुणे : रब्बी हंगामातील पीककर्ज व्याजासह शेतकऱ्यांनी परत केले. परंतु सहा महिने होऊनही, अद्यापही व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी हिताचा निर्णय घेऊन जिल्ह्यातील शेतकरी वर्गास दिलासा द्यावा, अशी मागणी किसान सभेच्या वतीने आंबेगाव, खेड, जुन्नर येथील तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये, अल्प मुदत पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी, संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे जे सभासद अल्प मुदत पीक कर्ज घेतात. शेतकऱ्यांनी, बँकेने निश्चित केलेल्या परतफेड तारखेस नियमित परतफेड केल्यास अशा शेतकऱ्याना व्याज सवलत योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंत केंद्र, राज्य शासन तसेच बँकेमार्फत व्याज सवलत दिली जाते. चालू आर्थिक वर्षात, व्याज सवलतीच्या देय रक्कम शासनामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे, असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीककर्ज व्याजासह भरावे लागत आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे झाले शेतकरी आर्थिक संकटात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गास सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याकडून व्याजासह पीक कर्जाची रक्कम वसूल करणे सुरू आहे. ती थांबवून पूर्वीसारखेच शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार व्याजाची रक्कम थेट बँकांना वर्ग करण्यात यावी, अशी आग्रही मागणी किसान सभेने केली आहे.
आंबेगाव तालुका समितीचे पदाधिकारी कृष्णा वडेकर, अशोक पेकारी, राजू घोडे, सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे, लक्ष्मण मावळे, मच्छिंद्र वाघमारे यांनी नुकतेच तहसील कार्यालय, आंबेगाव येथे शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार ए. बी. गवारी यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. याच मागण्यांचे निवेदन किसान सभेच्या जुन्नर, खेड व राजगुरुनगर तालुक्यांतील तहसीलदार यांना देण्यात आले.
पुणे : रब्बी हंगामातील पीककर्ज व्याजासह शेतकऱ्यांनी परत केले. परंतु सहा महिने होऊनही, अद्यापही व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी हिताचा निर्णय घेऊन जिल्ह्यातील शेतकरी वर्गास दिलासा द्यावा, अशी मागणी किसान सभेच्या वतीने आंबेगाव, खेड, जुन्नर येथील तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये, अल्प मुदत पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी, संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे जे सभासद अल्प मुदत पीक कर्ज घेतात. शेतकऱ्यांनी, बँकेने निश्चित केलेल्या परतफेड तारखेस नियमित परतफेड केल्यास अशा शेतकऱ्याना व्याज सवलत योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंत केंद्र, राज्य शासन तसेच बँकेमार्फत व्याज सवलत दिली जाते. चालू आर्थिक वर्षात, व्याज सवलतीच्या देय रक्कम शासनामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे, असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीककर्ज व्याजासह भरावे लागत आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे झाले शेतकरी आर्थिक संकटात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गास सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याकडून व्याजासह पीक कर्जाची रक्कम वसूल करणे सुरू आहे. ती थांबवून पूर्वीसारखेच शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार व्याजाची रक्कम थेट बँकांना वर्ग करण्यात यावी, अशी आग्रही मागणी किसान सभेने केली आहे.
आंबेगाव तालुका समितीचे पदाधिकारी कृष्णा वडेकर, अशोक पेकारी, राजू घोडे, सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे, लक्ष्मण मावळे, मच्छिंद्र वाघमारे यांनी नुकतेच तहसील कार्यालय, आंबेगाव येथे शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार ए. बी. गवारी यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. याच मागण्यांचे निवेदन किसान सभेच्या जुन्नर, खेड व राजगुरुनगर तालुक्यांतील तहसीलदार यांना देण्यात आले.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.