[ad_1]
नांदेड : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पूर्व सूचना देऊन शासनाच्या निकषांचे पालन केले. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यास त्यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले.
जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२० मध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पीक विम्याच्या निकषानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग, यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते.
ऑनलाइन पद्धतीने ईमेल, ॲप व टोल फ्री क्रमांकाद्वारे तसेच विमा कंपनी, कृषी विभाग व महसुल विभाग यांच्याकडे नुकसानीची पूर्व सूचना देण्याबाबत सांगितले होते.
जिल्ह्यातील साधरणत: ६४ हजार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत कंपनीस पूर्वसूचना दिल्या. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचे काम संबंधित विमा कंपनीतर्फे चालु आहे.
ज्या शेतकऱ्यांचे पीक कापून शेतात ठेवल्यानंतर (काढणी पश्चात) पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते असे साधारणतः: १२ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पूर्व सूचना दिल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे देखील विमा कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्याचे काम सुरु आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीसाठी विमा कंपनीने ६४ कोटी ८९ लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
उत्पादकतेची माहिती देणे सुरू
ज्या महसुल मंडळांमध्ये चालु वर्षाची उत्पादकता उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी येते, तेथे त्या तुलनेत पीकविमा लागू होतो. ही आकडेवारी सर्व यंत्रणांकडून गोळा करून पीक विमा कंपनीस सादर करण्याचे काम सुरु आहे. ही आकडेवारी विमा कंपनीस पोहोचल्यानंतर एक महिन्यानंतर उत्पादकता कमी आलेल्या महसुल मंडळामध्ये पीकविमा मंजूर होईल.
नांदेड : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पूर्व सूचना देऊन शासनाच्या निकषांचे पालन केले. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यास त्यांनी तालुका कृषी कार्यालय किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले.
जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२० मध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पीक विम्याच्या निकषानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग, यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते.
ऑनलाइन पद्धतीने ईमेल, ॲप व टोल फ्री क्रमांकाद्वारे तसेच विमा कंपनी, कृषी विभाग व महसुल विभाग यांच्याकडे नुकसानीची पूर्व सूचना देण्याबाबत सांगितले होते.
जिल्ह्यातील साधरणत: ६४ हजार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत कंपनीस पूर्वसूचना दिल्या. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचे काम संबंधित विमा कंपनीतर्फे चालु आहे.
ज्या शेतकऱ्यांचे पीक कापून शेतात ठेवल्यानंतर (काढणी पश्चात) पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते असे साधारणतः: १२ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पूर्व सूचना दिल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे देखील विमा कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्याचे काम सुरु आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीसाठी विमा कंपनीने ६४ कोटी ८९ लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
उत्पादकतेची माहिती देणे सुरू
ज्या महसुल मंडळांमध्ये चालु वर्षाची उत्पादकता उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी येते, तेथे त्या तुलनेत पीकविमा लागू होतो. ही आकडेवारी सर्व यंत्रणांकडून गोळा करून पीक विमा कंपनीस सादर करण्याचे काम सुरु आहे. ही आकडेवारी विमा कंपनीस पोहोचल्यानंतर एक महिन्यानंतर उत्पादकता कमी आलेल्या महसुल मंडळामध्ये पीकविमा मंजूर होईल.
[ad_2]
Source link