[ad_1]
पुणे ः पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज दरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यंदा दोन पिकांच्या पीक कर्ज दरात वाढ केली आहे. यामध्ये आडसाली ऊस आणि डाळिंब पिकांसाठी सर्वाधिक म्हणजे सहा हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे.
दरवर्षी पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्चित केलेले दर यावर प्रगतिशील शेतकरी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये सोमवारी (ता.११) चर्चा झाली. त्यामध्ये ही कर्ज दरवाढ निश्चित केली.
याशिवाय खेळत्या भांडवलामध्ये शेळी, मेंढीच्या संगोपनाच्या कर्जदरातही ५ हजार रुपयांना वाढ केली आहे. पूर्वी त्यासाठी १५ हजार रुपये दिले जात होते. आता त्यामध्ये वाढ करून ते २० हजार रुपये देण्यात येतील. येत्या २०२१-२२ च्या आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हा बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात पीक कर्जवाटप केले जाते. या बॅंकेचे जिल्ह्यात जवळपास २७५ शाखांमधून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येते. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० हून अधिक आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने, तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.
उसासाठी ६००० रुपये वाढ
चालू वर्षी शेती कर्जातील आडसाली उसामध्ये सहा हजार रुपयांना वाढ करून एक लाख २६ हजार रुपये कर्जदर निश्चित केले. तर, डाळिंबामध्ये पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. आता एक लाख ४५ हजार रुपये पीककर्ज दर निश्चित केले आहेत. उर्वरित कोणत्याही पिकांच्या कर्जदरात वाढ केलेली नाही.
पुणे ः पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज दरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यंदा दोन पिकांच्या पीक कर्ज दरात वाढ केली आहे. यामध्ये आडसाली ऊस आणि डाळिंब पिकांसाठी सर्वाधिक म्हणजे सहा हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे.
दरवर्षी पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्चित केलेले दर यावर प्रगतिशील शेतकरी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये सोमवारी (ता.११) चर्चा झाली. त्यामध्ये ही कर्ज दरवाढ निश्चित केली.
याशिवाय खेळत्या भांडवलामध्ये शेळी, मेंढीच्या संगोपनाच्या कर्जदरातही ५ हजार रुपयांना वाढ केली आहे. पूर्वी त्यासाठी १५ हजार रुपये दिले जात होते. आता त्यामध्ये वाढ करून ते २० हजार रुपये देण्यात येतील. येत्या २०२१-२२ च्या आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हा बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात पीक कर्जवाटप केले जाते. या बॅंकेचे जिल्ह्यात जवळपास २७५ शाखांमधून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येते. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० हून अधिक आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने, तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.
उसासाठी ६००० रुपये वाढ
चालू वर्षी शेती कर्जातील आडसाली उसामध्ये सहा हजार रुपयांना वाढ करून एक लाख २६ हजार रुपये कर्जदर निश्चित केले. तर, डाळिंबामध्ये पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. आता एक लाख ४५ हजार रुपये पीककर्ज दर निश्चित केले आहेत. उर्वरित कोणत्याही पिकांच्या कर्जदरात वाढ केलेली नाही.
[ad_2]
Source link