[ad_1]
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील पेंडुर (ता.मालवण) येथील रोहीत दीपक गावडे या कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याने सुरू केलेल्या अंडी उबवण केंद्राला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.ए. शिंपी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने सुरू केलेले आणि ३० हजारांची क्षमता असलेले जिल्ह्यातील हे पहिले केंद्र आहे.
जिल्ह्यात महिन्याला ४० हजारांहून अधिक कोंबडीची पिल्ले जिल्ह्याबाहेरून येतात. त्यासाठी वाहतूक खर्च देखील मोठा येतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातच पिल्ले उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून पशुसंवर्धन विभागाचे प्रयत्न सुरू होते.
पेंडूर येथील रोहीत दीपक गावडे या कुक्कुटपालन शेतकऱ्याने अंडी उबवण केंद्राचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळाली असून या केंद्राला शुभारंभ पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिंपी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक कौशिक गावडे, सहव्यवस्थापक तुषार कदम, डॉ. तुषार वेर्लेकर, सरपंच सुनीता मोरजकर, दीपक गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शिंपी म्हणाले कुक्कुटपालन करणारा एक शेतकरी उद्योजक होत असल्याचे समाधान पशुसंवर्धन विभागाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी जिल्ह्याबाहेरून कोंबडीची पिल्ले आणावी लागत होती. ती आता जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहेत. वाहतूक खर्च कमी होणार आहेच परंतु वाहतुकीदरम्यान होणाऱ्या पिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.
व्यवसायाला चालना मिळेल
या उबवण केंद्रांची क्षमता ३० हजार आहे. आठवड्याला ८ ते १० हजार पिल्ले उपलब्ध होणार आहेत. इतकी क्षमता असलेले जिल्ह्यातील हे पहिले उबवण केंद्र आहे. जिल्ह्याचा कुक्कुटपालन व्यवसाय वाढीच्या दृष्टीने हे उबवण केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील पेंडुर (ता.मालवण) येथील रोहीत दीपक गावडे या कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याने सुरू केलेल्या अंडी उबवण केंद्राला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.ए. शिंपी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने सुरू केलेले आणि ३० हजारांची क्षमता असलेले जिल्ह्यातील हे पहिले केंद्र आहे.
जिल्ह्यात महिन्याला ४० हजारांहून अधिक कोंबडीची पिल्ले जिल्ह्याबाहेरून येतात. त्यासाठी वाहतूक खर्च देखील मोठा येतो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातच पिल्ले उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून पशुसंवर्धन विभागाचे प्रयत्न सुरू होते.
पेंडूर येथील रोहीत दीपक गावडे या कुक्कुटपालन शेतकऱ्याने अंडी उबवण केंद्राचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळाली असून या केंद्राला शुभारंभ पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिंपी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक कौशिक गावडे, सहव्यवस्थापक तुषार कदम, डॉ. तुषार वेर्लेकर, सरपंच सुनीता मोरजकर, दीपक गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शिंपी म्हणाले कुक्कुटपालन करणारा एक शेतकरी उद्योजक होत असल्याचे समाधान पशुसंवर्धन विभागाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी जिल्ह्याबाहेरून कोंबडीची पिल्ले आणावी लागत होती. ती आता जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहेत. वाहतूक खर्च कमी होणार आहेच परंतु वाहतुकीदरम्यान होणाऱ्या पिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.
व्यवसायाला चालना मिळेल
या उबवण केंद्रांची क्षमता ३० हजार आहे. आठवड्याला ८ ते १० हजार पिल्ले उपलब्ध होणार आहेत. इतकी क्षमता असलेले जिल्ह्यातील हे पहिले उबवण केंद्र आहे. जिल्ह्याचा कुक्कुटपालन व्यवसाय वाढीच्या दृष्टीने हे उबवण केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.