[ad_1]
अमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा या वर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांसाठी होणारी प्लॉटची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शेती उपयोगी साहित्याची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होते. सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी या यात्रेतील मुक्या जनावरांचा बळी देण्याची प्रथा बंद झाली. त्यानंतर यात्रेतील तमाशा फड बंद करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यात्रेला शासकीय दर्जा प्राप्त करून देण्यात आला.
यंदा कोरोनाचा प्रभाव पाहता शासनाने ही ऐतिहासिक यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बहिरम यात्रेची सुरुवात २० डिसेंबरपासून होते. त्याकरिता दुकानांसाठी जागेचा लिलाव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केला जातो. या लिलाव प्रक्रियेतून चांदूरबाजार पंचायत समितीला दरवर्षी १२ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न होते त्यावरूनच या यात्रेच्या भव्यतेच्या भव्यतेची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. यात्रेतील दुकानांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध होतो. कोट्यावधीची उलाढाल यात्रेदरम्यान होते. मात्र आता यात्राच रद्द झाल्याने हे सारे व्यवहार, प्रक्रिया ठप्प झाली आहे.
परंपरेप्रमाणे २० डिसेंबर रोजी होमहवन व पूजन केले जाईल. मात्र मंदिर परिसरात केवळ संस्थानचे अध्यक्ष व मर्यादित विश्वस्तांची उपस्थिती राहणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश न देता नियम-अटी पाळून केवळ मुखदर्शन घेता येईल.
– किशोर ठाकरे,
विश्वस्त, बैरम बाबा संस्थान
अमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा या वर्षी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांसाठी होणारी प्लॉटची लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शेती उपयोगी साहित्याची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होते. सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी या यात्रेतील मुक्या जनावरांचा बळी देण्याची प्रथा बंद झाली. त्यानंतर यात्रेतील तमाशा फड बंद करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यात्रेला शासकीय दर्जा प्राप्त करून देण्यात आला.
यंदा कोरोनाचा प्रभाव पाहता शासनाने ही ऐतिहासिक यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बहिरम यात्रेची सुरुवात २० डिसेंबरपासून होते. त्याकरिता दुकानांसाठी जागेचा लिलाव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केला जातो. या लिलाव प्रक्रियेतून चांदूरबाजार पंचायत समितीला दरवर्षी १२ ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न होते त्यावरूनच या यात्रेच्या भव्यतेच्या भव्यतेची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. यात्रेतील दुकानांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध होतो. कोट्यावधीची उलाढाल यात्रेदरम्यान होते. मात्र आता यात्राच रद्द झाल्याने हे सारे व्यवहार, प्रक्रिया ठप्प झाली आहे.
परंपरेप्रमाणे २० डिसेंबर रोजी होमहवन व पूजन केले जाईल. मात्र मंदिर परिसरात केवळ संस्थानचे अध्यक्ष व मर्यादित विश्वस्तांची उपस्थिती राहणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश न देता नियम-अटी पाळून केवळ मुखदर्शन घेता येईल.
– किशोर ठाकरे,
विश्वस्त, बैरम बाबा संस्थान
[ad_2]
Source link