[ad_1]
भंडारा : गेल्या काही वर्षापासून कृषीपंपधारक शेतकऱ्याकडून थकीत व नियमित वीज बिलाचा भरणा करण्यात आला नाही. परिणामी लाखांदूर तालुक्यातील ६६० कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती लाखांदूर येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक लाखांदूर तालुक्यात ७००० कृषीपंपधारक आहेत. या वीजपंपधारक शेतकऱ्यांकडून गत काही वर्षांत थकीत अथवा नियमित वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने सद्यःस्थितीत तालुक्यातील ९०६ कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत तालुक्यातील तब्बल ६६० कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी ८० लक्ष ८८ हजार रुपये थकीत बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे संबंधित कृषीपंपधारकांचा वीजपुरवठा कायम खंडित करण्यात आला आहे.
त्यामध्ये बारव्हा वीज मंडळा अंतर्गत ५४, लाखांदूर ६५, सरांडी (बु.) १३१ व विरली (बु) वीज मंडळांतर्गत सर्वाधिक ४१० कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. वीज कंपनीकडून सुरू असलेल्या या अन्यायकारक कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
भंडारा : गेल्या काही वर्षापासून कृषीपंपधारक शेतकऱ्याकडून थकीत व नियमित वीज बिलाचा भरणा करण्यात आला नाही. परिणामी लाखांदूर तालुक्यातील ६६० कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती लाखांदूर येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक लाखांदूर तालुक्यात ७००० कृषीपंपधारक आहेत. या वीजपंपधारक शेतकऱ्यांकडून गत काही वर्षांत थकीत अथवा नियमित वीजबिलाचा भरणा न करण्यात आल्याने सद्यःस्थितीत तालुक्यातील ९०६ कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत तालुक्यातील तब्बल ६६० कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी ८० लक्ष ८८ हजार रुपये थकीत बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे संबंधित कृषीपंपधारकांचा वीजपुरवठा कायम खंडित करण्यात आला आहे.
त्यामध्ये बारव्हा वीज मंडळा अंतर्गत ५४, लाखांदूर ६५, सरांडी (बु.) १३१ व विरली (बु) वीज मंडळांतर्गत सर्वाधिक ४१० कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. वीज कंपनीकडून सुरू असलेल्या या अन्यायकारक कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
[ad_2]
Source link