[ad_1]
नवी दिल्ली ः संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर भारतात बंदचा प्रभाव अधिक जाणवला. देशभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी महामार्ग, रस्ते, रेल्वे मार्ग रोखले. तर दुकाने आणि बाजारही अनेक ठिकाणी बंद होते. पंजाब आणि हरियानात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात तसेच हमीभावाचा कायदा करावा आणि प्रस्तावित वीजबिल कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी मागील चार महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी (ता. २६) सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘भारत बंद’चे आवाहन केले होते.
पंजाब आणि हरियानात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी महामार्ग रोखले, तसेच शेतकरी रेल्वे मार्गांवरही ठाण मांडून बसले होते. पंजाब आणि हरियानामध्ये बहुतांश ठिकाणी दुकाने बंद होती. सार्वजनिक वाहतूकही अनेक ठिकाणी बंद ठेवण्यात आली होती. भटिंडा, लुधियाना, अमृतसर, पतियाळा, मोहाली, रोहतक, फिरोजपूर, पठाणकोट, झाज्जर, जिंद, पंचकुला, कैठाल, यमुनानगर आणि भिवानी या जिल्ह्यांमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. पंजाब आणि हरियानात ४४ ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे मार्गांवर ठाण मांडले होते. त्यामुळे चार शताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयेही बंद होती.
भारत बंदचा दिल्लीमध्ये जास्त प्रभाव जाणवला नाही. दिल्लीतील मेट्रो सेवा, रस्ते वाहतूक सुरळीत सुरू होती. तर महत्त्वाचे बाजारही व्यवस्थित सुरू होते. तसेच पोलिसांनीही पर्याप्त सुरक्षा व्यवस्था दिली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टीकरी सीमा, बहादूरगड शहर आणि ब्रिगेडियर होशियारसिंग मेट्रो स्टेशनचे गेट बंद करण्यात आले होते.
ओडिशातही आंदोलकांनी ठिकठिकाणी बंद पाळला. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्ग अडविण्यात आले होते. तर बहुतांश ठिकाणी दुकाने आणि बाजार बंदच होते. ओडिशात काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बंदला पाठिंबा दिला होता. तसेच बंदमुळे सरकारी कार्यालयांमध्येही कमी कर्मचारी हजर होते. आंध्र प्रदेशातील मड्डीलापालेम या ठिकाणी झालेल्या आंदोलनात डाव्या पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला. तसेच वायझॅक स्टील प्लांटच्या खासगीकरणालाही आंदोलकांनी विरोध केला. तर क्रिष्णा जिल्ह्यातही ठिकाठिकाणी आंदोलन करण्यात आले.
प्रतिक्रिया
सत्याग्रहाने अत्याचार, अन्याय आणि अहंकाराचा शेवट होतो, हे भारतीय इतिहासाने दाखवून दिले आहे. ही चळवळ राष्ट्रीय हितासाठी शांततापूर्ण मार्गाने व्हावी.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते
बंदचा परिणाम
- देशभरात अनेक ठिकाणी रेल्वेसेवा प्रभावित
- उत्तर भारतात ‘बंद’ला मोठा प्रतिसाद
- शेतकऱ्यांनी महामार्ग, रेल्वेमार्ग रोखले
- ठिकठिकाणी दुकाने, बाजारही बंद
- कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही
- जवळपास सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा
नवी दिल्ली ः संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर भारतात बंदचा प्रभाव अधिक जाणवला. देशभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी महामार्ग, रस्ते, रेल्वे मार्ग रोखले. तर दुकाने आणि बाजारही अनेक ठिकाणी बंद होते. पंजाब आणि हरियानात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात तसेच हमीभावाचा कायदा करावा आणि प्रस्तावित वीजबिल कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी मागील चार महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवारी (ता. २६) सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘भारत बंद’चे आवाहन केले होते.
पंजाब आणि हरियानात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी महामार्ग रोखले, तसेच शेतकरी रेल्वे मार्गांवरही ठाण मांडून बसले होते. पंजाब आणि हरियानामध्ये बहुतांश ठिकाणी दुकाने बंद होती. सार्वजनिक वाहतूकही अनेक ठिकाणी बंद ठेवण्यात आली होती. भटिंडा, लुधियाना, अमृतसर, पतियाळा, मोहाली, रोहतक, फिरोजपूर, पठाणकोट, झाज्जर, जिंद, पंचकुला, कैठाल, यमुनानगर आणि भिवानी या जिल्ह्यांमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. पंजाब आणि हरियानात ४४ ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे मार्गांवर ठाण मांडले होते. त्यामुळे चार शताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयेही बंद होती.
भारत बंदचा दिल्लीमध्ये जास्त प्रभाव जाणवला नाही. दिल्लीतील मेट्रो सेवा, रस्ते वाहतूक सुरळीत सुरू होती. तर महत्त्वाचे बाजारही व्यवस्थित सुरू होते. तसेच पोलिसांनीही पर्याप्त सुरक्षा व्यवस्था दिली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टीकरी सीमा, बहादूरगड शहर आणि ब्रिगेडियर होशियारसिंग मेट्रो स्टेशनचे गेट बंद करण्यात आले होते.
ओडिशातही आंदोलकांनी ठिकठिकाणी बंद पाळला. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्ग अडविण्यात आले होते. तर बहुतांश ठिकाणी दुकाने आणि बाजार बंदच होते. ओडिशात काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बंदला पाठिंबा दिला होता. तसेच बंदमुळे सरकारी कार्यालयांमध्येही कमी कर्मचारी हजर होते. आंध्र प्रदेशातील मड्डीलापालेम या ठिकाणी झालेल्या आंदोलनात डाव्या पक्षाच्या नेत्यांनी भाग घेतला. तसेच वायझॅक स्टील प्लांटच्या खासगीकरणालाही आंदोलकांनी विरोध केला. तर क्रिष्णा जिल्ह्यातही ठिकाठिकाणी आंदोलन करण्यात आले.
प्रतिक्रिया
सत्याग्रहाने अत्याचार, अन्याय आणि अहंकाराचा शेवट होतो, हे भारतीय इतिहासाने दाखवून दिले आहे. ही चळवळ राष्ट्रीय हितासाठी शांततापूर्ण मार्गाने व्हावी.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते
बंदचा परिणाम
- देशभरात अनेक ठिकाणी रेल्वेसेवा प्रभावित
- उत्तर भारतात ‘बंद’ला मोठा प्रतिसाद
- शेतकऱ्यांनी महामार्ग, रेल्वेमार्ग रोखले
- ठिकठिकाणी दुकाने, बाजारही बंद
- कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही
- जवळपास सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.