[ad_1]
परभणी : ‘‘इंद्रजित भालेराव लोकप्रिय कवी आहेत. ते केवळ परभणीचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे कवी आहेत. त्यांनी भाषेची मशागत करून शेतकऱ्यांची कविता जगासमोर आणली. पाखरांचे, प्राण्यांचे नाद, लय त्यांच्या कवितेत आली आहे. कवितेचा हा सांस्कृतिक ठेवा महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी परभणी येथे बुधवारी (ता.२) केले.
विद्यार्थ्यांतर्फे कवी इंद्रजित भालेराव ‘कृतज्ञता सोहळा’आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. गया भालेराव, खासदार संजय जाधव उपस्थित होते.
पठारे म्हणाले, ‘‘कोल्हापूर नंतर परभणीत सांस्कृतिक पायाभरणीचा प्रयत्न भालेराव यांनी केला. त्यांच्या कवितेत शेतकरी ऐवजी ‘कुणबी’ हा शब्द आयोजिलेला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बी. रघुनाथ यांच्यानंतर मोठे कवी म्हणून भालेराव महत्त्वाचे आहेत.’’
भालेराव म्हणाले, ‘‘शेती आणि शेतकऱ्यांची कविता लिहिली. कृषी विद्यापीठासाठी गीत लेखन केले, याचा आनंद आहे. विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात नावलौकिकास पात्र ठरले, हीच मोठी आयुष्यातील समाधानाची गोष्ट आहे.’’
डॉ. ढवण म्हणाले, ‘‘भालेराव यांची ‘माझा बाप’ ही विलक्षण कविता प्रेरणादायी आहे.’’ सूत्रसंचालन सुनील तुरुकमाने यांनी केले. आभार बालासाहेब जाधव यांनी मानले.
परभणी : ‘‘इंद्रजित भालेराव लोकप्रिय कवी आहेत. ते केवळ परभणीचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे कवी आहेत. त्यांनी भाषेची मशागत करून शेतकऱ्यांची कविता जगासमोर आणली. पाखरांचे, प्राण्यांचे नाद, लय त्यांच्या कवितेत आली आहे. कवितेचा हा सांस्कृतिक ठेवा महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांनी परभणी येथे बुधवारी (ता.२) केले.
विद्यार्थ्यांतर्फे कवी इंद्रजित भालेराव ‘कृतज्ञता सोहळा’आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. गया भालेराव, खासदार संजय जाधव उपस्थित होते.
पठारे म्हणाले, ‘‘कोल्हापूर नंतर परभणीत सांस्कृतिक पायाभरणीचा प्रयत्न भालेराव यांनी केला. त्यांच्या कवितेत शेतकरी ऐवजी ‘कुणबी’ हा शब्द आयोजिलेला आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बी. रघुनाथ यांच्यानंतर मोठे कवी म्हणून भालेराव महत्त्वाचे आहेत.’’
भालेराव म्हणाले, ‘‘शेती आणि शेतकऱ्यांची कविता लिहिली. कृषी विद्यापीठासाठी गीत लेखन केले, याचा आनंद आहे. विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात नावलौकिकास पात्र ठरले, हीच मोठी आयुष्यातील समाधानाची गोष्ट आहे.’’
डॉ. ढवण म्हणाले, ‘‘भालेराव यांची ‘माझा बाप’ ही विलक्षण कविता प्रेरणादायी आहे.’’ सूत्रसंचालन सुनील तुरुकमाने यांनी केले. आभार बालासाहेब जाधव यांनी मानले.
[ad_2]
Source link