[ad_1]
वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल. आपले उत्पन्न वाढविता येईल, या उद्देशाने सुमारे चार वर्षांपूर्वी शेतकऱ्याने कोटेशन भरले. विजेसाठी खांबही उभे राहले. मात्र, अर्धवट काम झाल्याने वीज कंपनीकडून या शेतकऱ्याला अद्यापही वीज पुरवठा मिळू शकलेला नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित कंत्राटदार शेतकऱ्याकडून पैसे घेऊन पसार झाला असून, आता अधिकारीही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील शेतकरी शेषराव कुंडलिक भोकरे यांनी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी शेतात वीज पुरवठा घेण्यासाठी कोटेशन भरले. त्यानंतर काही दिवसांनी कंत्राटदारामार्फत शेतामध्ये खांब उभे केले. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराची याच भागात इतरही कामे सुरू होती. आपले काम लवकर व्हावे म्हणून शेतकरी सातत्याने कंत्राटदाराच्या संपर्कात होता. पैसे देऊनही कंत्राटदाराने मात्र तारा न ओढताच काढता पाय घेतला.
तेंव्हापासून भोकरे हे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. २०१७ पासून त्यांच्या शेतात केवळ खांब उभे आहेत. शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित राहला आहे. यामुळे चार वर्षांपासून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल. आपले उत्पन्न वाढविता येईल, या उद्देशाने सुमारे चार वर्षांपूर्वी शेतकऱ्याने कोटेशन भरले. विजेसाठी खांबही उभे राहले. मात्र, अर्धवट काम झाल्याने वीज कंपनीकडून या शेतकऱ्याला अद्यापही वीज पुरवठा मिळू शकलेला नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित कंत्राटदार शेतकऱ्याकडून पैसे घेऊन पसार झाला असून, आता अधिकारीही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, रिसोड तालुक्यातील भोकरखेडा येथील शेतकरी शेषराव कुंडलिक भोकरे यांनी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी शेतात वीज पुरवठा घेण्यासाठी कोटेशन भरले. त्यानंतर काही दिवसांनी कंत्राटदारामार्फत शेतामध्ये खांब उभे केले. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराची याच भागात इतरही कामे सुरू होती. आपले काम लवकर व्हावे म्हणून शेतकरी सातत्याने कंत्राटदाराच्या संपर्कात होता. पैसे देऊनही कंत्राटदाराने मात्र तारा न ओढताच काढता पाय घेतला.
तेंव्हापासून भोकरे हे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. २०१७ पासून त्यांच्या शेतात केवळ खांब उभे आहेत. शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे शेतकरी मात्र सिंचनापासून वंचित राहला आहे. यामुळे चार वर्षांपासून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.