[ad_1]
सोलापूर : मारापूर (ता. मंगळवेढा) येथील १२ कोंबड्या अचानक मृत्युमुखी पडल्या आहेत. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. त्या बाबतचा अहवाल चार दिवसांमध्ये येणार आहे. त्यानंतर नेमक्या त्या कशामुळे दगावल्या, हे समजेल असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. जंगलगीतील बर्ड फ्लूच्या घटनेनंतर इथेही त्याचीच शक्यता व्यक्त होत आहे.
मारापूर येथील रामचंद्र गोविंद यादव यांच्या घरासमोर असणाऱ्या खुराड्यातील १२ कोंबड्या दगावल्या. यादव यांनी प्रशासनाला त्या बाबतची माहिती दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने तिथे भेट देऊन मृत कोंबड्याचे नमुने घेऊन पुण्याला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
जंगलगी येथील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याने तेथील ७५० कोंबड्या आणि ११० अंडी प्रशासनाने नष्ट केली होती. तसेच परिसरातील घरोघरी जाऊन कोंबड्यांचा शोध सुरू ठेवला आहे.
मारापूर येथील कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्या परिसरातील पशू-पक्षीपालक चिंतेत आहेत. दरम्यान, त्या परिसरात दहा किलोमीटर भागात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच या भागात कोंबड्यांची खरेदी-विक्री, वाहतूक यासर्वांवर निर्बंध आणल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
सोलापूर : मारापूर (ता. मंगळवेढा) येथील १२ कोंबड्या अचानक मृत्युमुखी पडल्या आहेत. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. त्या बाबतचा अहवाल चार दिवसांमध्ये येणार आहे. त्यानंतर नेमक्या त्या कशामुळे दगावल्या, हे समजेल असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. जंगलगीतील बर्ड फ्लूच्या घटनेनंतर इथेही त्याचीच शक्यता व्यक्त होत आहे.
मारापूर येथील रामचंद्र गोविंद यादव यांच्या घरासमोर असणाऱ्या खुराड्यातील १२ कोंबड्या दगावल्या. यादव यांनी प्रशासनाला त्या बाबतची माहिती दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने तिथे भेट देऊन मृत कोंबड्याचे नमुने घेऊन पुण्याला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
जंगलगी येथील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याने तेथील ७५० कोंबड्या आणि ११० अंडी प्रशासनाने नष्ट केली होती. तसेच परिसरातील घरोघरी जाऊन कोंबड्यांचा शोध सुरू ठेवला आहे.
मारापूर येथील कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्या परिसरातील पशू-पक्षीपालक चिंतेत आहेत. दरम्यान, त्या परिसरात दहा किलोमीटर भागात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच या भागात कोंबड्यांची खरेदी-विक्री, वाहतूक यासर्वांवर निर्बंध आणल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
[ad_2]
Source link