[ad_1]
पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरीचा दणका सुरूच आहे. खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पिकांच्या नुकसानीत वाढ होत असून, शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातील पूर्वमोसमीचा प्रभाव कमी झाल्या आहेत. परंतु वातावरणात बदल होत असल्याने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन तर सायंकाळी पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत असल्याने शेतकरी चांगलाच हातघाईस आला आहे.
कोकण, मराठवाडा व विदर्भात पाऊस नसला तरी उकाड्यात मात्र वाढ होत आहे. सध्या कांदा काढणी वेगाने सुरू आहे. तर काही भागात द्राक्षे, डाळिंब, गहू, कलिंगडाची काढणी सुरू आहे. आधीच कोरोनामुळे शेतात उभे असलेल्या पिकांच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच विक्रीची समस्या असल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणीचा डोंगर उभा राहत आहे.
खानदेशातही पाऊस
खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे पिकांना चांगलाच फटका बसला. सांगलीतील नेर्ले, साताऱ्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. सोलापुरातही पावसाने तुरळक ठिकाणी जोरदार सरी
बरसला होता. उस्मानाबादमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याने काही प्रमाणात हवेत गारवा तयार झाला होता.
पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरीचा दणका सुरूच आहे. खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. काही ठिकाणी जोरदार वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पिकांच्या नुकसानीत वाढ होत असून, शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातील पूर्वमोसमीचा प्रभाव कमी झाल्या आहेत. परंतु वातावरणात बदल होत असल्याने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन तर सायंकाळी पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होत असल्याने शेतकरी चांगलाच हातघाईस आला आहे.
कोकण, मराठवाडा व विदर्भात पाऊस नसला तरी उकाड्यात मात्र वाढ होत आहे. सध्या कांदा काढणी वेगाने सुरू आहे. तर काही भागात द्राक्षे, डाळिंब, गहू, कलिंगडाची काढणी सुरू आहे. आधीच कोरोनामुळे शेतात उभे असलेल्या पिकांच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच विक्रीची समस्या असल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणीचा डोंगर उभा राहत आहे.
खानदेशातही पाऊस
खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे पिकांना चांगलाच फटका बसला. सांगलीतील नेर्ले, साताऱ्यातील काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. सोलापुरातही पावसाने तुरळक ठिकाणी जोरदार सरी
बरसला होता. उस्मानाबादमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याने काही प्रमाणात हवेत गारवा तयार झाला होता.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.