[ad_1]
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठा ९३ टक्क्यांपुढे गेला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात ९८.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, उर्ध्व पेनगंगा, निम्न तेरणा, निम्न दुधना व सीनाकोळेगाव हे मोठे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. विष्णुपुरी प्रकल्पात ९४ टक्के, मांजरा प्रकल्पात ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पात ९२.२० टक्के, ७५२ लघू प्रकल्पात ७९.५८ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात ७०.९९ टक्के, तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २५ बंधाऱ्यात ९३.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
मोठ्या ११ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपुढे उपयुक्त पाणीसाठा असून ६७ मध्यम व ५९० लघू प्रकल्पही ७५ टक्क्यांपुढे उपयुक्त पाणीसाठा साठवून बसले असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील एक व बीड जिल्ह्यातील एक मिळून दोन लघू प्रकल्पात अजूनही पाण्याचा थेंब नाही. २१ लघू प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही जोत्याखालील असल्याचेही जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात ९९ टक्के तर ९६ लघू प्रकल्पात ८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पात १०० टक्के व ५७ लघू प्रकल्पात ७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ९२ टक्के तर १२६ लघू प्रकल्पांत ८६ टक्के, लातूर जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांत ८१ टक्के तर ८ मध्यम प्रकल्पांत ६७ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांत ९१ टक्के तर २०५ लघू प्रकल्पांत ६८ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत ९२ टक्के तर नऊ मोठ्या प्रकल्पात १०० टक्के, परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पात १०० टक्के तर २२ लघू प्रकल्पांत ८७ टक्के, हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत ९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याचेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील बोंड आळी लघुपाटबंधारे प्रकल्प नादुरुस्त असल्याची माहितीही जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठा ९३ टक्क्यांपुढे गेला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात ९८.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, उर्ध्व पेनगंगा, निम्न तेरणा, निम्न दुधना व सीनाकोळेगाव हे मोठे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. विष्णुपुरी प्रकल्पात ९४ टक्के, मांजरा प्रकल्पात ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पात ९२.२० टक्के, ७५२ लघू प्रकल्पात ७९.५८ टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात ७०.९९ टक्के, तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २५ बंधाऱ्यात ९३.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
मोठ्या ११ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपुढे उपयुक्त पाणीसाठा असून ६७ मध्यम व ५९० लघू प्रकल्पही ७५ टक्क्यांपुढे उपयुक्त पाणीसाठा साठवून बसले असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील एक व बीड जिल्ह्यातील एक मिळून दोन लघू प्रकल्पात अजूनही पाण्याचा थेंब नाही. २१ लघू प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही जोत्याखालील असल्याचेही जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात ९९ टक्के तर ९६ लघू प्रकल्पात ८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पात १०० टक्के व ५७ लघू प्रकल्पात ७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ९२ टक्के तर १२६ लघू प्रकल्पांत ८६ टक्के, लातूर जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांत ८१ टक्के तर ८ मध्यम प्रकल्पांत ६७ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांत ९१ टक्के तर २०५ लघू प्रकल्पांत ६८ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत ९२ टक्के तर नऊ मोठ्या प्रकल्पात १०० टक्के, परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पात १०० टक्के तर २२ लघू प्रकल्पांत ८७ टक्के, हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत ९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याचेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील बोंड आळी लघुपाटबंधारे प्रकल्प नादुरुस्त असल्याची माहितीही जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
[ad_2]
Source link