[ad_1]
औरंगाबाद : मराठवाड्यातील गोदावरीच्या पट्ट्यात अतिरिक्त उसामुळे हंगाम मेपर्यंत लांबणार आहे. एकीकडे कार्यक्षेत्रातील उसाच्याच गाळपाचा प्रश्न कारखान्यांसमोर असताना अतिरिक्त उसाचेही गाळप होण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मराठवाड्यात यंदा ६० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. यात औरंगाबाद, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ७, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी ५, नांदेड व परभणीतील प्रत्येकी ६, लातूरमधील १० व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १४ कारखान्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा गाळपासाठी जवळपास १ लाख ३९ हजार हेक्टरवरील ऊस उपलब्ध होता. या तीन जिल्ह्यांतील १९ कारखान्यांनी ३ मार्चपर्यंत ६२ लाख ११ हजार ९९१ टन उसाचे गाळप केले. अनेक कारखाने क्षमतेपेक्षा जास्त गाळप करीत असले; तरी काही गाळपात मागे आहेत.
अतिरिक्त ऊसाबाबत काही कारखान्यांनी परस्पर समन्वय, काही ठिकाणी प्रशासनाचा हस्तक्षेप सुरू आहे. परंतु औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर आहे. जालना जिल्ह्यातील समर्थ युनिट १ व २ च्या कार्यक्षेत्रात साडेपाच लाख टन अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. तर बागेश्वरी कारखान्याच्या क्षेत्रातही दीड लाख टन उसाचा प्रश्न आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील मुक्तेश्वर (ता. गंगापूर) कारखाना क्षेत्रात ३ लाख ८४ हजार टन उसाचा प्रश्न आहे.
१६ एकर ऊस होता, त्यापैकी ८ एकरांतील ऊस परभणी जिल्ह्यात कारखान्याने कसाबसा नेला. उर्वरित आठ एकरांची कारखान्यांकडे नोंदणी आहे, वाट पाहतोय कधी ते ऊस घेऊन जातात याची.
– संभाजीराव सोळंके, नागापूर, ता. परळी, जि. बीड.आमच्याकडे साधारणत: साडेपाच लाख टन अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. जवळपास १६ ते १७ कारखान्यांशी आम्ही संपर्क करून ऊस उचलीसाठी प्रयत्न चालविले आहेत. काही कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस नेण्यास सुरू केले आहे. संपूर्ण ऊस संपेपर्यंत आम्ही कारखाना सुरू ठेवणार आहोत.
– बी. टी पावसे, समर्थ कारखाना, जालनाअतिरिक्त ऊस असलेल्या भागाच्या लगतचे कारखान्यांना ऊस घालून प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे शेवटचं टिपरू शिल्लक राहणार नाहीत तोपर्यंत कारखाने बंद होणार नाहीत.
– शरद जरे, प्रादेशिक सहसंचालक, (साखर), औरंगाबाद
औरंगाबाद : मराठवाड्यातील गोदावरीच्या पट्ट्यात अतिरिक्त उसामुळे हंगाम मेपर्यंत लांबणार आहे. एकीकडे कार्यक्षेत्रातील उसाच्याच गाळपाचा प्रश्न कारखान्यांसमोर असताना अतिरिक्त उसाचेही गाळप होण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मराठवाड्यात यंदा ६० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. यात औरंगाबाद, बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ७, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी ५, नांदेड व परभणीतील प्रत्येकी ६, लातूरमधील १० व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १४ कारखान्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत यंदा गाळपासाठी जवळपास १ लाख ३९ हजार हेक्टरवरील ऊस उपलब्ध होता. या तीन जिल्ह्यांतील १९ कारखान्यांनी ३ मार्चपर्यंत ६२ लाख ११ हजार ९९१ टन उसाचे गाळप केले. अनेक कारखाने क्षमतेपेक्षा जास्त गाळप करीत असले; तरी काही गाळपात मागे आहेत.
अतिरिक्त ऊसाबाबत काही कारखान्यांनी परस्पर समन्वय, काही ठिकाणी प्रशासनाचा हस्तक्षेप सुरू आहे. परंतु औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर आहे. जालना जिल्ह्यातील समर्थ युनिट १ व २ च्या कार्यक्षेत्रात साडेपाच लाख टन अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. तर बागेश्वरी कारखान्याच्या क्षेत्रातही दीड लाख टन उसाचा प्रश्न आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील मुक्तेश्वर (ता. गंगापूर) कारखाना क्षेत्रात ३ लाख ८४ हजार टन उसाचा प्रश्न आहे.
१६ एकर ऊस होता, त्यापैकी ८ एकरांतील ऊस परभणी जिल्ह्यात कारखान्याने कसाबसा नेला. उर्वरित आठ एकरांची कारखान्यांकडे नोंदणी आहे, वाट पाहतोय कधी ते ऊस घेऊन जातात याची.
– संभाजीराव सोळंके, नागापूर, ता. परळी, जि. बीड.आमच्याकडे साधारणत: साडेपाच लाख टन अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. जवळपास १६ ते १७ कारखान्यांशी आम्ही संपर्क करून ऊस उचलीसाठी प्रयत्न चालविले आहेत. काही कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस नेण्यास सुरू केले आहे. संपूर्ण ऊस संपेपर्यंत आम्ही कारखाना सुरू ठेवणार आहोत.
– बी. टी पावसे, समर्थ कारखाना, जालनाअतिरिक्त ऊस असलेल्या भागाच्या लगतचे कारखान्यांना ऊस घालून प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे शेवटचं टिपरू शिल्लक राहणार नाहीत तोपर्यंत कारखाने बंद होणार नाहीत.
– शरद जरे, प्रादेशिक सहसंचालक, (साखर), औरंगाबाद
[ad_2]
Source link