[ad_1]
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २७८५ एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील एकूण क्षेत्र ९७४३ एकरांवर विस्तारले असल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.
प्रतिकूल स्थितीतही रेशीम उद्योग शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करीत असल्याने या उद्योगाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. प्राप्त माहितीनुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १०८१ गावांत २८ फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत ६५७१ शेतकऱ्यांकडे ६९५७ एकर ५ गुंठ्यांवर तुतीचे क्षेत्र होते. या क्षेत्रात त्यानंतर लागवड झालेल्या २७८५ शेतकऱ्यांच्या २७८५ एकर क्षेत्राची भर पडली आहे.
नव्याने लागवड झालेल्या क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ४७१ शेतकऱ्यांचे ४७१ एकर, जालना जिल्ह्यातील २२३ शेतकऱ्यांचे २२५ एकर, परभणी २०४ शेतकऱ्यांचे २०४ एकर हिंगोली १३८ शेतकऱ्यांचे १३८ एकर, नांदेड जिल्ह्यातील २१५ शेतकऱ्यांचे २१५ एकर, लातूर जिल्ह्यातील १९० शेतकऱ्यांचे १८९ एकर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४७० शेतकऱ्यांचे ४६९ एकर ७५ गुंठे तर बीड जिल्ह्यातील ८७४ शेतकऱ्यांचे सर्वाधिक ८७४ एकर क्षेत्राचा समावेश आहे. नव्याने लागवड झालेल्या क्षेत्रामुळे मराठवाड्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ९३५६ वर तर तुतीचे क्षेत्र ९७४३ एकर २५ गुंठ्यांवर पोहोचले असल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हानिहाय तुतीचे क्षेत्र (एकरांमध्ये) | |
औरंगाबाद | १३०८ |
जालना | ९८० |
परभणी | ९३७ |
हिंगोली | ४५६ |
नांदेड | ८३३ |
लातूर | ५६८ |
उस्मानाबाद | १७२३.३ |
बीड | २९३८ |
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २७८५ एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील एकूण क्षेत्र ९७४३ एकरांवर विस्तारले असल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.
प्रतिकूल स्थितीतही रेशीम उद्योग शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करीत असल्याने या उद्योगाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. प्राप्त माहितीनुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १०८१ गावांत २८ फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत ६५७१ शेतकऱ्यांकडे ६९५७ एकर ५ गुंठ्यांवर तुतीचे क्षेत्र होते. या क्षेत्रात त्यानंतर लागवड झालेल्या २७८५ शेतकऱ्यांच्या २७८५ एकर क्षेत्राची भर पडली आहे.
नव्याने लागवड झालेल्या क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ४७१ शेतकऱ्यांचे ४७१ एकर, जालना जिल्ह्यातील २२३ शेतकऱ्यांचे २२५ एकर, परभणी २०४ शेतकऱ्यांचे २०४ एकर हिंगोली १३८ शेतकऱ्यांचे १३८ एकर, नांदेड जिल्ह्यातील २१५ शेतकऱ्यांचे २१५ एकर, लातूर जिल्ह्यातील १९० शेतकऱ्यांचे १८९ एकर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ४७० शेतकऱ्यांचे ४६९ एकर ७५ गुंठे तर बीड जिल्ह्यातील ८७४ शेतकऱ्यांचे सर्वाधिक ८७४ एकर क्षेत्राचा समावेश आहे. नव्याने लागवड झालेल्या क्षेत्रामुळे मराठवाड्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ९३५६ वर तर तुतीचे क्षेत्र ९७४३ एकर २५ गुंठ्यांवर पोहोचले असल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हानिहाय तुतीचे क्षेत्र (एकरांमध्ये) | |
औरंगाबाद | १३०८ |
जालना | ९८० |
परभणी | ९३७ |
हिंगोली | ४५६ |
नांदेड | ८३३ |
लातूर | ५६८ |
उस्मानाबाद | १७२३.३ |
बीड | २९३८ |
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.