[ad_1]
औरंगाबाद : बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षनिक संपाला मराठवाड्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या संपाच्या निमित्ताने सर्व बाजार समितीमधील व्यवहार ठप्प होते.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाबतीत केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात बाबत व बाजार समिती कर्मचाऱ्यास शासन सेवेत घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाच्या वतीने शुक्रवारी (ता. २१) राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांना शासन सेवेत सहभागी करण्यासाठी गठित केलेल्या अभ्यास समितीचा अहवाल २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाकडे सादर केलेला आहे. परंतु, आजतागायत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात विरोध व बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावेश करण्यासाठी शुक्रवारी पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत एक दिवसाचा संप झाला.
या संपास महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचा पाठिंबा असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. कर्मचारी शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवूनच सर्व कर्मचारी बाजार समित्यांमध्ये सेवा देतात. कोरोना संकटातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा देऊन जीवनावश्यक वस्तूंचा अन्नधान्य व भाजीपाला यांचा तुटवडा होउ दिला नाही. तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था होण्यासाठी बाजार आवार चालू ठेवून शेतकऱ्यांसाठी व बाजार घटकांसाठी काम केले. याकडेही कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
जालन्यात सचिव आर. एस. इंगळे, लेखापाल पी. व्ही. जाधव, बी. आर. मस्के आदींच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधकांना निवेदन सादर करण्यात आले. औरंगाबाद बीड, उस्मानाबाद, लातूर, आदी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या व उपबाजारासह तालुका स्तरावरील बाजार समित्यांमधील सर्व कामे ठप्प होती.
औरंगाबाद : बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षनिक संपाला मराठवाड्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या संपाच्या निमित्ताने सर्व बाजार समितीमधील व्यवहार ठप्प होते.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाबतीत केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात बाबत व बाजार समिती कर्मचाऱ्यास शासन सेवेत घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाच्या वतीने शुक्रवारी (ता. २१) राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांना शासन सेवेत सहभागी करण्यासाठी गठित केलेल्या अभ्यास समितीचा अहवाल २० नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाकडे सादर केलेला आहे. परंतु, आजतागायत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात विरोध व बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावेश करण्यासाठी शुक्रवारी पहाटे पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत एक दिवसाचा संप झाला.
या संपास महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचा पाठिंबा असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. कर्मचारी शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवूनच सर्व कर्मचारी बाजार समित्यांमध्ये सेवा देतात. कोरोना संकटातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा देऊन जीवनावश्यक वस्तूंचा अन्नधान्य व भाजीपाला यांचा तुटवडा होउ दिला नाही. तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था होण्यासाठी बाजार आवार चालू ठेवून शेतकऱ्यांसाठी व बाजार घटकांसाठी काम केले. याकडेही कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
जालन्यात सचिव आर. एस. इंगळे, लेखापाल पी. व्ही. जाधव, बी. आर. मस्के आदींच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधकांना निवेदन सादर करण्यात आले. औरंगाबाद बीड, उस्मानाबाद, लातूर, आदी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या व उपबाजारासह तालुका स्तरावरील बाजार समित्यांमधील सर्व कामे ठप्प होती.
[ad_2]
Source link